अनधिकृत शाळा बंद करण्याच्या मागणीसाठी विश्वास पाटील यांचा उपोषणाचा इशारा

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात सुरु असलेल्या अनधिकृत शाळांवर कारवाई न केल्यास १० रोजी उपोषणास बसण्याचा इशारा विश्वासराव पाटील बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांनी उपविभागीय अधिकारी यांना लेखी पत्र दिले असून उपोषणास बसण्याची परवानगी मागितली आहे.

पाटील यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, अमळनेर तालुक्यात तीन अनधिकृतपणे शाळा सुरु आहेत. याबाबत शिक्षणाधिकारी यांनी २१ ऑगस्ट रोजी अनिधिकृत शाळा तपासणी करून त्या बंदकरण्याचे आदेश दिले होते. मात्र स्थानिक अधिकाऱ्यांनी ती बाब गाभिर्याने घेतली नाही. २०२३ पासून तातुक्यात सुरु असलेल्या अनधिकृत शाळा बंद करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. जर सर्रासपणे अनधिकृत शाळ सुरु असतील तर इतर शाळानी मान्यता घेवून काय फायदा, पालकांना शाळा मान्यता कशी असते. याबाबत कल्पना नसते. अशा अनधिकृतशाळांचे विद्यार्थी टक्केवारी घेवून इतर अनुदानित शाळेत दाखविले जात असल्याने शासनाचे आर्थिक नुकसान होत आहे. अशा शाळांवर कारवाई व्हावी. अन्यथा १०सप्टेंबरपासून उपोषणास बसण्याचा इशारा विश्वास पाटील यांनी दिला.

 

  • Related Posts

    *स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी..* *”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर*

    : *चालु घडामोडी*   *11 सप्टेंबर – 2025*   🔖 *प्रश्न.1) टेस्ला कारचे भारतातील पहिले ग्राहक कोण ठरले आहेत ?*   *उत्तर -* प्रताप सरनाईक   🔖 *प्रश्न.2) “ऑपरेशन सिंदूर”…

    *स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी..* *”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर*

      ❇️ TCS /IBPS pattern ❇️   1. देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते ? 1. गुजरात ✅ 2. सिक्किम 3. आसाम 4. महाराष्ट्र 👉 भारतातील पहिले सेंद्रिय…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *