मुसळधार पावसाने गरीब मजुराचे घर कोसळल्याने संसार उघड्यावर, सुदैवाने जीवित हानी टळली

अमळनेर (प्रतिनिधी) मुसळधार पावसाने शहरातील गरीब मजुराचे घर कोसळल्याने संसार उघड्यावर आला आहे. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. प्रशासन व नागरिकांकडून मदत मिळावी अशी मागणी केली जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील मिलचाळ परिसरात हात गाडीवर कुल्फी व भाजीपाला विक्री करणारे श्रीरंग सातपुते यांच्या घराचे गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने घराचे छत कोसळून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. संध्याकाळच्या गणपतीच्या आरतीच्या वेळेसच ही घटना घडली होती. सुदैवाने यात सातपुते हे बचावले आहेत. या घटनेस आठ दिवस होऊनही प्रशासनाकडून कोणतीही मदत झालेली नाही. मजुरी करून आपले पालन पोषण करीत असताना संततधार पावसात डोक्यावर छत नसल्याने सातपुते हे हवालदिल झाले असून शहरातील दानशूर व्यक्तींनी त्यांना मदतीचा हात द्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

 

  • Related Posts

    *स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी..* *”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर*

      ❇️ TCS /IBPS pattern ❇️   1. देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते ? 1. गुजरात ✅ 2. सिक्किम 3. आसाम 4. महाराष्ट्र 👉 भारतातील पहिले सेंद्रिय…

    केटी वेयर बंधाऱ्यांच्या नित्कृष्ट कामामुळे शेतजमीन कोरली जाऊन शेतकऱ्यांचे नुकसान

    अमळनेर (प्रतिनिधी) केटी वेयर बंधाऱ्यांच्या नित्कृष्ट कामामुळे शेतजमीन कोरली जाऊन शेतीचे नुकसान झाल्याची तक्रार तालुक्यातील रामेश्वर येथील शेतकऱ्यांनी लेखी निवेदनाद्वारे महसूल विभागाकडे केली आहे.   शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, …

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *