सततच्या पावसामुळे कापूस पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात आठवडाभरापासून सुरु असलेल्या पावसामुळे पिंपळे खु, पिंपळे बु, चिमनपुरी, मंगरूळ, आर्डी, शिरसाळे, अटाळे परिसरातील खरीप हंगाम धोक्यात आला आहे. तर सर्वाधिक फटका कापसाला बसत आहे. अमळनेर तालुक्यात सततच्या पावसामुळे कापूस या पिकावर  मर रोगाची सुरुवात झाली आहे. कापसाच्या झाडाची मुळे सडू लागल्या झाडांना बुरशी लागली आहे. लालसर होत आहे. तरी काही शेतकऱ्यांचे मर रोगामुळे व बऱ्याच शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली बुडाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाणार असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे तसेच सततच्या पावसामुळे मकच्या कनिसाला कोंब फुटले आहेत. मका पिक आडवे पडू लागले आहे. यंदा निसर्गाने भरभरून दिले, पण सततच्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावला. नुकसानग्रस्तांना सरसकट पंचनामे शासनाने करावे, असे शेतकरी ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

  • Related Posts

    *स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी..* *”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर*

    : *चालु घडामोडी*   *11 सप्टेंबर – 2025*   🔖 *प्रश्न.1) टेस्ला कारचे भारतातील पहिले ग्राहक कोण ठरले आहेत ?*   *उत्तर -* प्रताप सरनाईक   🔖 *प्रश्न.2) “ऑपरेशन सिंदूर”…

    *स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी..* *”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर*

      ❇️ TCS /IBPS pattern ❇️   1. देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते ? 1. गुजरात ✅ 2. सिक्किम 3. आसाम 4. महाराष्ट्र 👉 भारतातील पहिले सेंद्रिय…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *