पाण्याच्या मोटरीला पिन लावताना विजेचा शॉक लागून मठगव्हाण येथे महिलेचा मृत्यू

अमळनेर (प्रतिनिधी) पाण्याच्या मोटरला पिन लावायला गेली असता महिलेला विजेचा शॉक लागून तिचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील मठगव्हाण येथे ६ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, लताबाई भाऊसाहेब पाटील (वय ३९) ही घराच्या मागच्या बाजूस पाण्याच्या मोटरला पिन लावायला गेली असता विजेचा शॉक लागला. त्यामुळे ती खाली पडली. तिला तातडीने पातोंडा आरोग्य केंद्रात नेले असता डॉक्टरांनी ग्रामीण रुग्णालयात नेण्यास सांगितले. तेथे आणल्यावर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तारकेश्वर गांगुर्डे यांनी माहिती दिल्यावरून अमळनेर पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हेडकॉन्स्टेबल विजय भोई करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *