शिरपूर (प्रतिनिधी) भाजपाचे काम करताना डॉ. जितेंद्र ठाकूर यांनी शिरपूर मतदार संघात प्रामाणिकपणे दिवस रात्र सेवा करून जनमानसात आपले नाव कोरले आहे. मात्र ऐनवेळी पक्षाने त्यांच्याशी दगाफटका करीत काँग्रेसचे आमदार काशिराम पावरा आणि अमरिशभाई पटेल यांना भाजपात प्रवेश देऊन आमदार पावरा यांनाच तिकीट दिले. या स्वार्थी तुघलकी शाही निर्णयामुळे कार्यकर्त्यांची आग मस्तकात गेली. म्हणूनच या अन्यायाविरुद्ध पेटून उठत कार्यकर्त्यांनी डॉ. जितेंद्र ठाकूर यांना अपक्ष उमेदवारी करण्यास सांगून भाजपासह काँग्रेसींना धडा शिकवण्याचा चंग बांधला आहे. म्हणूनच डॉ. ठाकूर यांच्यावर झालेल्या अन्यायाची जाण जनतेला असल्याने ते त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल शिरपूर येथे भाजपाची सभा घेतली. आणि त्यांनीच मागील पाच वर्षांच्या काळात भाजपाचे सरकार आल्यास कॉंग्रेसचे भ्रष्टाचारी नेत्यांना तुरुंगात पाठवण्याचे जनतेस सांगितले होते. काळा पैसा भ्रष्टाचारीकडून काढणार असे ठणकावून सांगत होते मात्र त्यांनाच भाजपा पक्षात प्रवेश देऊन पक्षाची नितीमुल्ये तुडवून प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या भावनांना ठेस पोहचवली आहे. भाजपा्च्या या दुटप्पीपणाची जाणिव मतदारांना आहे. आमदार काशिराम पावरा आणि अमरिशभाई पटेल यांनी फक्त पक्ष बदलला आहे. त्यांची विचारधारा नाही. त्यांना निवडून देणे म्हणजे काँग्रेसलाच निवडून देणे असा स्पष्ट अर्थ लोकांना आता कळून चुकला आहे. त्यामुळे ज्या निष्ठावंत कार्यकर्त्यानी दिवस रात्र मेहनत करून तहान भूक विसरून पक्ष मोठा केला. त्या निष्ठावंताचा विचार न करता २४ तास पेक्षा कमी कालावधीत कॉंग्रेसचा आमदाराला प्रवेश देऊन तिकीट देतात. कुठे गेली पक्षाची विचारधारा ..निष्ठा.? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. त्यामुळे हा निष्ठावंतवर अन्याय नाही का ? भाजपाच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व निष्ठावंत व प्रबळ दावेदार तसेच नक्कीच विजय होणाऱ्या उमेदवारास तीकीट का नाही दिले ? तुमचा निष्ठावंत कार्यकर्त्यांवर विश्वास नाही का ? हा निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय नाही का ? याचे उत्तर आता नागरिकच मतदान पेटीत देतीलच.
आयत्या बिळावरचा नागोबा…
शिरपूर तालुक्यात डॉ जितेंद्र ठाकूर यांनी केलेली कार्य व त्यांच्यासाठी रात्रंदिवस उभे असलेले जनमत बघून विकासाचा खोटा ढोल पिटणाऱ्यांना चक्क आयत्या बिळावर नागोबा सारखे पक्षात प्रवेश करून बसावे लागले.त्यांना असे वाटत आहे की आता या पक्षात जनता निवडून देईल पण अस शक्य नाही.डॉ जितेंद्र ठाकूर यांच्या वर झालेला अन्याय कोणी सहन करणार नाही.
मोदींना चोर म्हणणाऱ्यांनाच घातले घरात…
नुकत्याच झालेल्या लोकसभेचा निवडणुकीत ज्यांना भाजपाने प्रवेश दिला त्यांनीच पंतप्रधान मोदींना आणि भाजपाला चोर म्हटले होते. आणि त्यांनाच पक्षात प्रवेश देऊन तिकीट ही दिले. वरून त्यांचा प्रचार करण्यासाठी मुख्यमंत्री येत असल्याने ही अत्यंत हस्यास्पद बाब आहे. तुम्ही म्हणतात मोदींच्या आशीर्वादाने सत्तेत येऊ.. मोदीजी आमचे नेते.. मग त्याच मोदींना मागील लोकसभेत निवडणुकीत चोर म्हणणाऱ्या उमेदवाराचा प्रचाराला कर्तव्यदक्ष, प्रामाणिक, निष्ठावंत मुख्यमंत्री म्हणून ख्याती असलेले आपण आलेत म्हणजे एक प्रकारे मोदी चोर आहेत याचं समर्थन करायला आले होते का ? हा मोदींचा अपमान नाही का ? मोदींवर प्रेम करणाऱ्या निष्ठावंतांचा अपमान नाही का ? असा प्रश्न कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक उपस्थित करू लागले आहेत. याचे उत्तरही शिरपूर मतदार संघातील जनता योग्यवेळी देणारच आहे, असा विश्वास डॉ.ठाकूर यांच्या कार्यकर्त्यांना आहे.