अमळनेर (प्रतिनिधी) साईनामा च्या गजराने वाघ बिल्डिंग जवळील साईबाबा मंदिर येथून विजया दशमी दसरा निमित्त सकाळी श्रींच्या पालखी मिरवणुकीला सुरुवात झाली. यात भाविक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.
प्रथम सकाळ ५ ची काकड आरती व ध्वजा रोहण मयूर उदय महाजन यांनी केले परिसर पूर्णपणे साईंच्या नाम घोषांनी दणाणून गेले होते.सकाळची आरती माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते करून मिरवणुकीला प्रारंभ झाला मिरवणूक झामी चौक मार्ग वाडी संस्थान दगडी दरवाजा पवन चौक पुन्हा साईबाबा मंदिर येथे विनोद कदम यांच्या हस्ते मध्यान्ह आरतीने मिरवणुकीची सांगता झाली. यावेळी साईबाबा महोत्सव समिती पदाधिकारी साईभक्त महिला मंडळ युवक बांधव युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साईबाबा मंदिर बांधून २७ वर्ष झाले असून मंडळाने शिर्डीला असतात तेच उत्सव वर्ष भर साजरी करण्याचे निश्चित केले आहे.मंडळाच्या दुसऱ्या वर्षी पालखी मिरवणुकीला सुरुवात केली.तीच सेवा आज पर्येंत कायम आहे,असे मंडळाच्या अध्यक्षा अनिता प्रवीण महाजन यांनी साईबाबा मंदिराची माहिती देतांना सांगितले आहे. कार्येक्रमांना महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती.