लग्नाच्या वाढदिवसा निमित्ताने गो शाळेच्या माध्यमातून केले अन्नदान
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर शहरातील हजारो गोर गरीब नागरिकांना श्रीमती भानूबेन गो शाळेच्या माध्यमातून अस्सल खानदेशी वरण बट्टीचे भोजन देत माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील आणि नगराध्यक्षा जिजामाता कृषिभूषण पुष्पलता पाटील यांनी आपल्या लग्नाचा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला. अमळनेर शहरातील १७ केंद्रांवर सोशल डिस्टनसिंगचे पालन करत हे अन्नदान करण्यात आले. तसेच त्यांनी स्वतः उपस्थित लोकांना मास्कचेही वाटप केले.
अमळनेर शहरात सुरू असलेले अन्नदान क्षेत्राला आर्थिक अडचणी येत असतांनाच माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी पुढाकार घेऊन एक दिवसाचा अन्न दान खर्च स्वतः केला. लग्नाला ४६ वर्ष पूर्ण झाली म्हणून त्यांनी स्वतः पांचाळ वस्ती,व्हाइट बिल्डिंग येथे उपस्थित राहून वरण बट्टी भाजीचे जेवण आज मंगळवारी वाटप केले.अमळनेर शहरातील १७ केंद्रांवर सोशल डिस्टनसिंगचे पालन करत हे अन्नदान करण्यात आले. तसेच त्यांनी स्वतः उपस्थित लोकांना मास्कचे ही वाटप केले.याप्रसंगी रामभाऊ संदानशिव,गोक्षेत्र प्रतिष्ठाणच्या भानूबेन शहा गोशाळेचे वतीने प्रा. पवार, सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे, नगरसेवक निशांत अग्रवाल,निलेश साळुंके, बन्सीलाल भागवत,बोरसे आबा आदि मान्यवर उपस्थित होते.
व्हाइट बिल्डिंग परिसरातील अन्नदानासाठी रोहित अग्रवाल, नितीन उपाध्याय, प्रशांत उपाध्याय, निखिल कोठारी,मोहीत अग्रवाल, दिनेश परदेशी,प्रतिक शहा आदिंनी परिश्रम घेतले.गोक्षेत्र प्रतिष्ठाणचे संचालक चेतन शहा, चेतन सोनार, संदिप घोरपडे यांनी कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या उदार दातृत्वासाठी आभार मानले.