खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ब्रेकिंग

खान्देशी बोली मराठी साहित्य संमेलनात रात्री उत्तरोत्तर रंगत केले कविसंमेलन

रसिकांनी कवितांना भरभरून दाद देत टाळ्यांचा केला वर्षाव

अमळनेर(प्रतिनिधी) खान्देशी बोली मराठी साहित्य संमेलनात बहारदार कवी संमेलनाने रंगत आणली. रात्री झालेले हे कविसंमेलन एक से बढकर एक कवितांना उत्तरोत्तर रंगत गेले. तर कविंना रसिकांनी दाद देऊन त्यांना उत्साह वाढवला. रात्री उशिरा ११ वाजेपर्यंत कवी संमेलन रंगले होते. कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध कवी अशोक कोतवाल होते. यात कवी विष्णू थोरे, प्रमोद अंबडकार , रमेश धनगर, कृपेश महाजन यांच्या कवितेने श्रोते मंत्रमुग्ध झाले. किशोर काळे, गणेश राऊत, शैलेश चव्हाण यांनी उपस्थितांची मन जिंकून गेले. अशोक कोतवाल यांची कविता सर्वांना भावली. उपस्थित रसिकांनी कवितांना भरभरून दाद देत टाळ्यांचा वर्षाव केला. प्रा रमेश माने यांनी सूत्रसंचालन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button