अमळनेर (प्रतिनिधी) ऋषिपंचमी निमित्ताने शहरातील विविध क्षेत्रातील महिला भगिनींनी आंबाऋषि टेकडीवरील मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबवून संपूर्ण परिसर चकचकीत केला.
सदर महिलानी मंदिर परिसरात असलेला कचरा, पुजेचे साहित्य स्वतः गोळा करून साफसफाई केली या उपक्रमात सेवानिवृत्त आयपीएस साहेबराव पाटील यांच्या पत्नी सौ शोभा साहेबराव पाटील,तसेच दक्षता समितीच्या सदस्या सौ भारती शिंदे, सौ सुनंदा निकम यासह असंख्य महिला भगिनींनी सहभाग घेतला.परंपरे प्रमाणे ऋषीपंचमीला महिला भगिनी ऋषी मुनींच्या मंदिरात दर्शनासह विविध धार्मिक कार्यक्रम करीत असतात परंतु या महिलांनी धार्मिक कार्यासोबतच सामाजिक जाणीव ठेवून स्वच्छतेचे महान कार्य केल्याने अनेकांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.