खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

भविष्यातील साहित्य विज्ञानाधारीत असेल परिसंवादातील उमटला सूर

‘मराठी विज्ञान साहित्याची भविष्यकालीन  वाटचाल’ या विषयावरील परिसंवाद रंगला

 

अमळनेर (प्रतिनिधी) भविष्यातील साहित्य हे विज्ञानावर आधारीत असेल, विज्ञान साहित्याच्या चिंतनाचा परीघ वाढेल आणि त्याच्या प्रेरणाही बदलतील. विज्ञान साहित्याच्या चिंतनाचा परिघ वाढेल व त्याच्या प्रेरणाही बदलतील, असा सूर ‌‘मराठी विज्ञान साहित्याची भविष्यकालीन वाटचाल’ या विषयावरील परिसंवादात उमटला.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात रविवारी दुपारी सभामंडप -१ खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी व्यासपीठावर ‌‘मराठी विज्ञान साहित्याची भविष्यकालीन वाटचाल’ या विषयावरील परिसंवाद झाला. त्यात सुनील सुळे, पुणे, विश्वाधार देशमुख,  नांदेड, डॉ.कोमल ठाकरे, नागपूर, डॉ.फुला बागुल, शिरपूर, डॉ.रंजन गर्गे, छत्रपती संभाजीनग या लेखकांनी सहभाग घेतला. पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर अध्यक्षस्थानी होते.

डॉ.फुला बागुल म्हणाले, भविष्य काळातील साहित्य हे विज्ञानावर आधारीत असेल. हे साहित्य ग्रामसंवेदन केंद्रित असेल. ते अस्तित्व वादाच्या अंगाने जाईल. सुनील सुळे म्हणाले, वास्तव विज्ञानादी आधारीत विज्ञान कथा हिच विज्ञानाची खरी असेल आणि ती लिहिली जाईल. विश्वाधार देशमुख म्हणाले, विज्ञान साहित्याबद्दलचे संभम दूर अगोदर दूर होणे गरजेचे आहे. डॉ.कोमल ठाकरे म्हणाले, संभवनीयतेच्या अंगाने भविष्यातील विज्ञान कथा लिहिली जाईल. डॉ.रंजन गर्गे यांनी सरोगेट मदर या वैज्ञानिक सूत्राशी निगडित कथा या अंगाने परिसंवादात विवेचन केले. डॉ. पंडित विद्यासागर यांनी अध्यक्षीय समारोप करताना भविष्यातील येणारी कथा ही नवनव्या  विज्ञान तंत्रज्ञानाला कवेत घेणारी असेल. प्रा.गोपीचंद धनगर यांनी सूत्रसंचालन केले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button