अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील नन्दगाव येथे शेतकऱ्यांनी शेतातून वेचून आणलेल्या कपाशीच्या गोण्या चोरट्यानी तीन वेगवेगळ्या घराच्या ओट्यावरून चोरून नेल्याची घटना सकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसानी दिलेली माहिती अशी की, नन्दगाव येथील सुनंदाबाई प्रल्हाद पाटील ,योगनाबाई अशोक पाटील , सुभाष बारकू पाटील यांनी आपापल्या शेतातून कापूस वेचून १३ रोजी रात्री गोण्या भरून घराच्या बाहेर ओट्यावर ठेवला होता. अज्ञात चोरट्यानी १४० किलो वजनाचा साडे आठ हजार रुपये किमतीचा कापूस चोरून नेला. सकाळी सहा वाजता सुनंदाबाई हिच्या निदर्शनास आले. अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.