विमा प्रतिनिधींच्या ऑल इंडिया लियाफी संघटनेतर्फे एलआयसी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने
अमळनेर (प्रतिनिधी) विमा प्रतिनिधींनी आपल्या विविध मागण्यांसाठी निदर्शने करीत विश्राम दिवस आंदोलन करण्यात आले. विमा प्रतिनिधींच्याऑल इंडिया लाईफ इन्शुरन्स एजंट्स फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनेतर्फे हे आंदोलन झाले.
विविध मागण्यांसाठी 1 सप्टेंबर पासून आंदोलन सुरू करण्यात आले आहे. अमळनेर शाखेतर्फे दि. 30 रोजी सर्व विमा प्रतिनिधिनी आपले काम बंद ठेऊन अमळनेर एलआयसी कार्यालयाबाहेर एकत्रित येत जोरदार निदर्शने केलीत,विमा प्रतिनिधींनी एक दिवस काम बंद ठेवले तर काय परिस्थिती होऊ शकते याची जाणीव सदर आंदोलनातून करून देण्यात आली. आंदोलनात नाशिक डिव्हिजन सेक्रेटरी पद्माकर साळुंखे,स्थानिक अध्यक्ष अनिल वाणी,माजी अध्यक्ष सीताराम पाटील,सचिव कुंदन पवार,उपाध्यक्ष राजेंद्र महाजन,सुनील पाटील,बी एन पाटील,रामकृष्ण चव्हाण, उमेश चौधरी,प्रवीण पाटील,संजय चौधरी,राजेंद्र महाजन,प्रकाश पाटील,दीपक भोई,डॉ आर एन पाटील,बाबूलाल पाटील,दयानंद माळी, अर्जुन पाटील,नरेंद्र पाटील,विजय पाटील,बी एस पाटील,हिंमत सूर्यवंशी,सुनंदा चौधरी,छाया पाटील,अंजु ढवळे यासह असंख्य प्रतिनिधी सहभागी झाले होते.
या मागण्यांसाठी केले आंदोलन
पॉलिसीवरील बोनस वाढला पाहिजे,पॉलिसी कर्जावरील व्याजदर कमी करावे,पॉलिसी वरील जीएसटी रद्द करा,एजंटांची ग्रॅज्युएटी वाढली पाहिजे,एजंटांना मेडिक्लेम लागू करावा,विमा एजंटांना सन्मानाने वागणूक द्यावी यासह असंख्य मागण्यांसाठी सदर आंदोलन करण्यात येत आहे.सदरचे आंदोलन संपुर्ण भारतभर सुरू असून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे.यापूढे नाशिक विभाग आणि मुंबई येथे घेराव घातला जाणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.