खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

बेपत्ता पाच वर्षाच्या बालिकेचा मृतदेह बोरी नदी पात्रात तरंगताना आढळला

मासे पकडणाऱ्या मुलांना दिसला मृतदेह, घातपाताचाही संशय

अमळनेर (प्रतिनिधी) गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता झालेल्या ५ वर्षीय बालिकेचा मृतदेह बोरी नदीच्या पात्रता तरंगताना आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही बालिका नदीपात्रात गेली कशी, असा प्रश्न उपस्थित होत असून तिचा घात झाला की अपघात असाही प्रश्न निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील कुरेशी मोहल्ल्यातील जोया शेख तैय्यब कुरेशी (वय ५ वर्ष) ही बालिका २३ नोव्हेंबर रोजी बेपत्ता झाली होती. कुटुंबियांनी तिचा सर्वत्र शोध घेतल्यानंतर देखील ती सापडली नाही. मात्र २४ रोजी लहान मुले मासे पकडण्यासाठी गेले असताना त्यांना नदीच्या डोहात या बिलिकेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर नागरिकांनी धाव घेत पाण्यातून तिचा मृतदेह काढण्यात आला. त्यानंतर तातडीने मृतदेह शव विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. डॉ. प्रकाश ताळे यांनी पालकांच्या मागणीनुसार इंनकॅमेरा शवविच्छेदन करून व्हिसेरा राखून ठेवला आहे. विविध तपासणी अहवाल मागवण्यात आले आहेत. ते अहलाव आल्यानंतर मुलाच्या मृत्यूचे खरे कारण समोर येईल. घटनास्थळी एपीआय मच्छीन्द्र दिवे , पोलीस उपनिरीक्षक शत्रुघ्न पाटील आणि मिलिंद भामरे यांनी भेट दिली. बघ्यानी एकच गर्दी केली होती. खेळता खेळता बालिका डोहात बुडाली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. परंतु ही मुलगी नदीपात्रात आली कसा याचाही शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे, तरच या घटनेची उकल होईल. यामागे घातपात असेल तर त्या दिशनेही पोलिसांना तपासाची चक्रे फिरवावी लागणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button