दारूबंदी न झाल्यास उपोषण करण्याचाही पोलिसांना इशारा
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील ढेकू गावात पुन्हा दारू विक्री झाल्याने संतप्त महिला आणि ग्रामस्थांनी अमळनेर पोलिस ठाण्यावर मोर्चा काढून दारू बंदीची मागणी केली. दारूबंदी न झाल्यास उपोषण करण्याचाही इशारा या वेळी देण्यात आला.
ढेकू गावात गेल्या २० वर्षांपासून दारू बंदी होती. मात्र गेल्या वर्षी कोरोनाच्या काळात पुनश्च दारू विक्री सुरू झाल्याने पुरुष व तरुण मुले देखील दारूच्या आहारी गेले आहेत. पुरुष दारू पिण्यासाठी महिलांना मारझोड करतात आणि पैसे हिसकावून नेतात तर १४ – १५ वर्षांची मुले देखील चोरून लपून दारू पित असल्याने त्यांच्या भवितव्यास धोका निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीने देखील ग्रामसभा बोलावून दारू बंदीचा ठराव केला आहे. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी दारू भट्ट्या उध्वस्त केल्या होत्या, मात्र दारू विक्रेत्यांनी बाहेरून दारू आणून विक्री सुरू केली आहे. बुधवारी सायंकाळी सुभाष पाटील, अरुण पाटील, दगाजी पाटील, अनिल पाटील , विश्वास पाटील , भिमराव पाटील ,ज्ञानेश्वर ठाकरे , रवींद्र पाटील , जितेंद्र सोनवणे ,उत्तमराव पाटील , मोहित पाटील ,गौरव पाटील, संजय पाटील , मनीषा पाटील , रमाबाई रामोशी ,अशाबाई मैराळे , देवकाबाई पाटील , उषाबाई मैराळे , मनीषा मैराळे , मालती पाटील , दुर्गा पाटील , ऋतुजा पाटील , सरला पाटील , सुधा पाटील , शालू पाटील , कल्पना पाटील , दगुबाई रामदास , सुवर्णा पाटील , मनीषा पाटील , दमोताबाई म्हस्के आदींनी पोलीस स्टेशनला मोर्चा काढून आपली व्यथा मांडली व दारू बंदी न झाल्यास उपोषणाला बसण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक नरसिंग वाघ याना निवेदन देण्यात आले.