अमळनेर (प्रतिनिधी) हरणांचा कळप तालुक्यातील नांद्री पातोंडा, मठगव्हाण, जळोद आणि गंगापुरी शिवारात कपाशीच्या पिकाची नासधूस करीत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. वन विभागाने या हरणांचा कळपचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.
तालुक्यातील नांद्री पातोंडा, मठगव्हाण, जळोद आणि गंगापुरी शिवारात शेतकर्यांनी
मे महिन्यात कापसाची लागवड केली आहे. बोअरवेल आणि विहिरीच्या पाण्याने कापसाचा उतारा चांगला आला आहे. मात्र या शिवारात वास्तव्यास असलेला मोकाट हरणांचा कळप कापसाची रोपे फस्त करत असल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्रस्त शेतकऱ्यांनी वन विभागाच्या साद घातली असून वन विभागणे या मोकाट हरणाच्या चाऱ्यांपाण्याची व्यवस्था करण्याची मागणी नांद्री येथील शेतकरी गणेश नारायण चौधरी यांनी केली आहे.