तहसीलदार आणि आमदारांना निवेदन देऊन मांडली व्यथा
अमळनेर (प्रतिनिधी) शासनाकडे विविध मागण्यांसाठी वारंवार मागण्या करूनही दखल घेतली जात नाही म्हणून १ मे महाराष्ट्र दिनापासून स्वस्त धान्य दुकानदारांनी धान्य वितरण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत तहसीलदार आणि आमदारांना निवेदन देण्यात आले.
तहसीलदार आणि आमदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या कोरोनाच्या महामारीत वितरण सुरू असतानाही स्वस्त धान्य दुकानदारांना विमा कवच देण्यात आलेले नाही. तसेच धान्य वाटप करताना लागण होऊन कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या दुकानदारांना मदत देण्यात आलेली नाही. स्वस्तधान्य दुकानदारांना शासकीय कर्मचार्यांनाचा दर्जा देण्यात यावा किंवा २७० रुपये प्रति क्विंटल मार्जिन देण्यात यावे , कोरोनात मृत्युमुखी पडलेल्याना ५० लाख रुपये मदत आणि कुटुंबातील सदस्यांना नोकरी देण्यात यावी , धान्य वाटप करताना एक ते दीड किलो घट येते ती ग्राह्य धरण्यात यावी. दुकानदारांना वीज बिल , दुकान भाडे , स्टेशनरी चार्जेस देण्यात यावेत ,ई पॉझ मशीनसाठी डेटा चार्जेस द्यावेत , कोरोनामुळे समूह संसर्ग टाळण्यासाठी ग्राहकांचा अंगठा न घेता दुकांदाराचा अंगठा घेऊन धान्य वितरित करण्याची परवानगी द्यावी , नोव्हेंबर दिसेम्बर चे कमिशन देण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन आमदार अनिल पाटील , तहसीलदार मिलिंद वाघ याना देण्यात येऊन १ पासून वितरण बंद चा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनावर यांच्या आहेत सह्या
निवेदनावर तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे , डॉ रामलाल पाटील , सुरेखाबाई पाटील , खटाबाई कोळी , प्रकाश मराठे , नरेंद्र पाटील , दिलीप सैनांनी , जयवंत वानखेडे , भगवान पाटील , प्रफुल पाटील आदींच्या सह्या आहेत.