कल्पनेश्वर प्रतिष्ठान व राजू फाफोरेकर मंडळातर्फे कार्यक्रमाचे आयोजन
अमळनेर(प्रतिनिधी) कल्पनेश्वर प्रतिष्ठान व राजू फाफोरेकर मंडळातर्फे कारगिल विजय दिनानिमित्त वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
यावेळी आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण आणि माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला.
भारताने २६ जुलै १९९९ रोजी कारगिलवर विजय मिळवला होता, यात भारतीय सैनिकांच योगदान, त्यांचं शौर्य अफाट होत, म्हणुनच हा दिवस भारतात कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. याच दिवसाचं औचित्य साधून ढेकू रोड, पिंपळे रोड भागात माजी सैनिक व आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या उपस्थितीत कल्पनेश्वर प्रतिष्ठाण व माजी नगरसेवक राजु फाफोरेकर यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आलेले होते. यावेळी आमदारांच्या हस्ते उपस्थित माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला, सदर कार्यक्रमाला माजी सैनिक अशोक साळुंखे, राजेंद्र पाटील, भूषण पाटील, धनराज पाटील, घनश्याम काटे, राहुल शिंपी, किरण देसले, जगदीश पाटील, हर्षल पाटील, पंकज पाटील, राकेश पांडव, अजय देशमुख, जितेंद्र सोनवणे, ऑन ड्युटी सुहास बडगुजर उपस्थित होते, यातील काही माजी सैनिकांनी कोरोनाच्या काळात देखील उल्लेखनीय काम केले आहे. ढेकू रोड, पिंपळे रोड भागात वृक्षारोपण झाल्यानंतर रोपांना संरक्षक जाळी देखील लावण्यात आल्या, या रोपांची पुढील जबाबदारी कल्पनेश्वर प्रतिष्ठानने घेतली आहे.
सदर वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला माजी नगरसेवक राजु फाफोरेकर, पवार, प्रा.सुरेश पाटील, घोरपडे, यज्ञेश्वर पाटील, तुषार पवार, जितेश कदम, पंकज भदाणे, अनिरुध्द ठाकरे, हितेश पवार, हरीश वाणी, राकेश पाटील, निलेश पाटील, आर.जे.पाटील, राहुल बहिरम, ए.डी.भदाणे, शरद पवार, पवन लोहार, अभिषेक ढमाळ, भुषण पाटील, अशोक पाटील, जे.एस.पाटिल, अनिल वाघ, मंगेश शिंपी, दिनेश पाटील, शंभू पंजे, विलास दोरकर, मुक्तार खाटीक, भागवत गुरूजी तसेच ढेकू रोड व पिंपळे रोड भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.