जळगांवहुन अमळनेरला येत असताना ढेकु गावाजवळ झाला अपघात
अमळनेर (प्रतिनिधी)भरधाव इंडिका गाडी झाडाला आदळून झालेल्या अपघातात अमळनेर येथील तरुणाचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीररीत्या जखमी झाला आहे. शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास तालुक्यातील ढेकु येथे हा अपघात झाला.
अमळनेर नगरपालिका दवाखाण्या जवळ गांधली पूरा येथील शेख अकबर आमीन( ३५) आणि दिलीप वंजारी हे शुक्रवार ५ रोजी इंडिका (क्र एम एच ०५ बी एल ३५६४) गाडीने जळगांवहुन अमळनेरला येत असताना ढेकु गावाजवळ एका झाड़ाला जोरदार आदळली. त्यामुळे अकबर व दिलीप हे दोघी गंभीर जख्मी झाले. त्यापैकी अकबर ला जोरदार मार लागल्याने त्याला धुळे येथे हलविण्यात आले. परंतु शनिवार सकाळी उपचार घेताना त्याचा मृत्यू झाला. दिलीप वजारीवर उपचार शुरू आहे. मृत अकबरच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी आई वडील २ भाऊ असा परिवार आहे.