अमळनेर ,(प्रतिनिधी) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डीस्टंसिंग पाळून तालुक्यातील खवशी येथे मंगळवारी मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थिती राकेश आणि ऐश्वर्या यांचा विवाह सोहळा पार पडला.
खवशी येथील शशिकांत बळीराम कापडे यांची मुलगी व प्रसाद कापडे यांच्या भगिनी ऐश्वर्या व एकतास येथील हरीचंद्र वाघ यांचे चिरंजीव राकेश यांच्या विवाहासाठी जिजाऊ बहुद्देशिय संस्थेच्या अध्यक्षा व भाजपा नेत्या अॅड. ललिता पाटील व अमळनेर पं. स. चे गटविकासाधिकारी संदीप वायाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सोशल डीस्टंसिंग पळण्यात आले. विवाहासाठी वधु वराकडील १५ ते २० नातेवाईक उपस्थित होते.यावेळी अॅड. ललिता पाटील व गटविकास अधिकारी संदिप वायाळ यांनी वधु- वराला भावी वैवाहिक जिवनासाठी शुभेच्छा देत कुटुंबियांनी घेतलेल्या आदर्श निर्णयाबद्दल कौतुक केले.