खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

खवशी येथे मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थिती राकेश आणि ऐश्वर्या यांनी घेतले सात फेरे

अमळनेर ,(प्रतिनिधी) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डीस्टंसिंग पाळून तालुक्यातील खवशी येथे मंगळवारी मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थिती राकेश आणि ऐश्वर्या यांचा विवाह सोहळा पार पडला.
खवशी येथील शशिकांत बळीराम कापडे यांची मुलगी व प्रसाद कापडे यांच्या भगिनी ऐश्वर्या व एकतास येथील हरीचंद्र वाघ यांचे चिरंजीव राकेश यांच्या  विवाहासाठी जिजाऊ बहुद्देशिय संस्थेच्या अध्यक्षा व भाजपा नेत्या अॅड. ललिता पाटील व अमळनेर पं. स. चे गटविकासाधिकारी संदीप वायाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सोशल डीस्टंसिंग पळण्यात आले.  विवाहासाठी वधु वराकडील १५ ते २०  नातेवाईक उपस्थित होते.यावेळी अॅड. ललिता पाटील व गटविकास अधिकारी संदिप वायाळ यांनी वधु- वराला भावी वैवाहिक जिवनासाठी शुभेच्छा देत कुटुंबियांनी घेतलेल्या आदर्श निर्णयाबद्दल कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button