🔷 चालू घडामोडी :- 03 जून 2025 ◆ देशातील पहिले कृषी हॅकेथॉन पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे. ◆ थायलंड देशाची ओपल सूचाता चुआंगश्री 72 व्या मिस वर्ल्ड 2025 स्पर्धेची विजेती ठरली आहे. ◆ 72व्या मिस वर्ल्ड 2025 स्पर्धेचे आयोजन हैद्राबाद येथे करण्यात आले होते. ◆ 72 व्या मिस वर्ल्ड …
जानवे येथे अंगणवाडी परिसरातच गुरे बांधून तयार केला गुरांचा गोठा
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील जानवे येथे अंगणवाडीच्या परिसरात व शॉपिंग सेंटर लगतच नागरिक गुरे बांधत आहेत. त्यामुळे मुलांच्या आरोग्यास आणि जिवास धोका निर्माण झाला आहे, अशी तक्रार जानवे येथील शरद साहेबराब पाटील यांनी केली आहे. शरद पाटील यांनी तक्रारीत म्हटले आहे की, ग्रामपंचायत मालकीच्या इमारतीलगत गुरे बांधली जात असल्याने आरोग्यावर परिणाम …
अमळनेर एस. टी. आगारातील दहा कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्त केल गौरव
अमळनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अमळनेर आगारातील दहा कर्मचारी एकाचवेळी निवृत्त झाल्याने माजी आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून निरोप देण्यात आला. सहकाऱ्यांना निरोप देताना उपस्थित कर्मचाऱ्यांचेही मन भरून आले होते. सर्वानी त्यांना सन्मानित केले. या वेळी माजी नगराध्यक्ष जयश्री अनिल पाटील, आगार व्यवस्थापक चौधरी व …
घराजवळील विजेचा खांब काढण्यासाठी एका कुटूंबाचा ३५ वर्षापासून लढा
अमळनेर (प्रतिनिधी) घराच्या प्रवेशद्वाराजवळ धोकेदायक विजेचा खांब काढण्यासाठी गेल्या पस्तीस वर्षांपासून लढा सुरू आहे. लोकशाही दिनी देखील तक्रार करूनही न्याय मिळाला नसल्याने आम्हाला कोणी न्याय देईल का म्हणून हे कुटुंब याचना करीत आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, गांधलीपुरा पारधीवाडा भागात शेळ युनूस हकीम बेलदार यांच्या लहानश्या पत्र्याच्या घराच्या प्रवेशद्वारासमोरच …
शेळावे येथे नव्याने उभारलेल्या वीज उपकेंद्राचे थाटात लोकार्पण
अमळनेर (प्रतिनिधी) जळगाव परिमंडळांतर्गत पारोळा तालुक्यातील शेळावे येथे नव्याने उभारण्यात आलेल्या ३३/११ के.व्ही. उपकेंद्राचा लोकार्पण सोहळा माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यामुळे नागरिकांचा विजेचा प्रश्न सुटणार आहे. या कार्यक्रमास जळगाव परिमंडळाचे मुख्य अभियंता इब्राहीम ए. मुलाणी उपस्थित होते. ३३६.७६ लक्ष रुपयांच्या खर्चातून उभारलेले आधुनिक …
निम येथे तापी नदीत पोहायला गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील निम येथे तापी नदीत पोहायला गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना 2 जून रोजी दुपारी घडली. याप्रकरणी पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, चेतन अरुण सुतार (वय९), हरीश बाळू पाटील (वय१२) अशी मृत मुलांची नावे असून चेतन अरुण सुतार ह्या …