अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील न्यू लक्ष्मी टॉकीज मागे शिव शक्ती चौक परिसरात अनेक दिवसांपासून साफसफाई होत नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
नगरपालिकेकडून बऱ्याच दिवसांपासून या विभागात असलेल्या कचराकुंडीची साफ-सफाई नियमितपणे होत नाही. बऱ्याचदा दोन दोन दिवस तिथे महानगरपालिकेचे कर्मचारी फिरकत सुद्धा नाहीत. परिणामतः कचराकुंडी तुडुंब भरून कचरा आजूबाजूला पसरतो. त्यामुळे मोकाट कुत्री जनावरे तिथेच वास्तव्य करतात. या सर्वांचा त्रास सामान्य नागरिकांना होत आहे. तसेच यामुळे नागरिकांच्या आरोग्यचाही प्रश्न निर्माण झाला आहे. नगरपालिकेने तातडीने या परिसरात साफसफाई करून नागरिकांच्या समस्या सोडवावाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.