साहित्य संमेलनात पथनाट्य व उद्बोधनगीतांतून करणार मतदार जनजागृती

अमळनेर (प्रतिनिधी) पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय अमळनेर आणि निवडणूक आयोग महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मतदार जागृती अभियान राबविण्यात येत आहे. यानिमित्ताने विद्यार्थ्यांना निवडूक अधिकाऱ्यांमार्फत मार्गदर्शन करण्यात आले.

साहित्य संमेलनामध्ये विद्यार्थी स्वयंसेवकाकडून  पथनाट्य व उद्बोधन गीतांचे सादरीकरण केले जाणार आहे. याच्या पूर्वतयारीसाठी महाविद्यालयात श्रीमती  (मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या मुख्य कार्यक्रम संयोजक पल्लवी जाधव, आणि समाज माध्यम समन्वयक रविशा साळुंखे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *