खबरीलाल– अमळनेर (प्रतिनिधी ) अमळनेर वाडी संस्थानचे प. पू. प्रसाद महाराज पंढरपूर वारीहून दि. ३० डिसेंबर रोजी वद्य एकादशीला अमळनेरात दाखल झाले. यावेळी त्यांचे वेशीवर भाविकांनी जोरदार स्वागत केले. यावेळी सखाराम महाराजांचा जयघोष करण्यात आला.
प. पू. प्रसाद महाराज हे अमळनेरात दाखल होताच वाडी संस्थांनमध्ये असंख्य महिला भगिनी व पुरुष भाविकांनी त्यांचे आशिर्वाद घेतले. प. पू. प्रसाद महाराज यावर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे पायी वारी ऐवजी वाहनाद्वारे पायी वारीस गेले होते. संपूर्ण चातुर्मास तेथे काढल्यानंतर कार्तिक पौर्णिमेला ते वाहनाद्वारेच अमळनेरकडे परतीच्या मार्गाला निघाले होते.
अमावस्या पर्यंत महाराज अमळनेर मुक्कामी
यादरम्यान त्यांनी त्यांच्या नित्यनियमांच्या गावांना भेटी दिल्या,व दि २९ रोजी तांमसवाडी करून बहादर वाडी येथे दाखल होऊन तेथे ते मुक्कामी होते. यानंतर काल वद्य एकादशीला अमळनेर येथे त्यांचे आगमन होऊन वाडी संस्थानात ते दाखल झालेत,आता अमावस्या पर्यंत महाराज अमळनेर मुक्कामी असून यानंतर पुढील प्रवास त्यांचा होणार आहे.