अमळनेर (प्रतिनिधी) दोन मुलींना घरी टाकून विवाहिता बेपत्ता झाल्याची घटना शहरातील वसई देवीमंदिराजवळ घडली. याप्रकरणी पोलिसांत हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अमळनेर शहरातील वसई देवी मंदिराजवळील ३४ वर्षीय विवाहित महिला आपल्या दोन मुलींना घरी टाकून मी गावातून जाऊन येते, असे सांगून घरातून बेपत्ता झाली. तिचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही. अखेर तिच्या पतीने फिर्याद दिल्यावरून हरवल्याची नोंद करण्यात आली असून तपास हेडकॉन्स्टेबल सुनील हटकर करीत आहेत.