अमळनेर (प्रतिनिधी) राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षावर विश्वास ठेवत अमळनेर येथील माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या अनेक सहकाऱ्यांनी प्रवेश केला. अनिल चौधरी यांच्या नेतृत्वात हा पक्षसोहळा झाला. यामुळे सहकाऱ्यांनी मुंबईत केलेला हा ‘प्रहार’ शिरीष चौधरी यांना चांगलाच धक्का देणारा ठरला आहे.
मुंबई येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांच्या पुढाकाराने अमळनेर येथील माजी नगरसेवक गुलाबबापू पाटीलसह प्रमुख नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला.
या पदाधिकाऱ्यांनी केला प्रवेश
या प्रसंगी अमळनेर माजी नगरसेवक गुलाब पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी मित्रपरिवार अध्यक्ष उपसरपंच रवींद्र पाटील, देवा ग्रुप शहराध्यक्ष दिनेश पाटील, छावा संघटना उत्तर महाराष्ट्र प्रमुख हिरामण पाटील, वावडे माजी सरपंच डॉ.दत्तात्रय ठाकरे, मुडी प्र. डोंगरी माजी उपसरपंच अरुण पाटील, ग्रामपंचायत सदस्य विश्वास पाटील, शिवसेना विभाग प्रमुख जवखेडा भिकन पाटील, गोकुळ कोळी, समाधान पाटील, किशोर पाटील, छत्रपती सेना जळगाव जिल्हाध्यक्ष चिन्मय पाटील, लोण खुर्द ग्रामपंचायत सदस्य बापूराव पाटील, प्रवीण पाटील यांच्यासह प्रमुख नेते, पदाधिकारी, माजी आमदार शिरीष चौधरी मित्र परिवारातील सदस्यांनी प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला.