सरपंच सुषमाताई पाटील आणि ग्रामपंचायत सदस्य,कर्मचारी,जागरुक ग्रामस्थांचा पुढाकार
अमळनेर (प्रतिनिधी)तालुक्यातील दहिवद येथे फुलांच्या झाडांचे रोपण करून गाव सुशोभीकरण करण्याचे पाउल टाकण्यात आले.
फूलांमध्ये नकारात्मक ऊर्जा समाप्त करण्याची शक्ती असते. फूलांच्याफूलांच्या सुगंधाने,रंगाने परिसरातील वातावरण शुध्द व परिसर सुशोभीत होतो.त्याच हेतुने दहिवद येथील सरपंच सुषमाताई वासुदेव पाटील यांनी व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, जागरुक ग्रामस्थ यांनी फुलांचे रोपे लावली. तत्पूर्वी स्वत: सरपंच सुषमाताई पाटील , ग्रामस्थांनी स्टीलचे कुंडी कलरींग केलीत. ग्रामपंचायत परिसर सुशोभित करण्याचे दृष्टीने एक पाऊल टाकले.