डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या संवेदना, व्‍यथा समजून देऊन केले राज्‍य घटनेचे लिखाण 

अमळनेर (प्रतिनिधी) काही राजकीय लोक स्‍वातंत्र्यसमता यांचा विचार करत नाहीत. शिक्षणाने आम्‍ही खोटं बोलायला शिकलो आहोत. सगळ्या संवेदना, व्‍यथा समजून देऊन राज्‍य घटनेचे लिखाण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. सेवा, त्‍याग, चारित्र्य आहे म्हणून किर्ती आहे. जग हे समुहाकडून व्‍यक्‍तीकडे चालले आहे. घटना दांडगाई करणाऱ्यांपर्यंत अजून पोहचलेली नाही,असे मत नॅनोशास्‍‍त्रज्ञ तथा प्रताप महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य डॉ. एल. ए. पाटील यांनी केले.

शिवशाही फाऊंडेशनतर्फे आयोजित व्‍याख्यानात ते “भारतीय संविधानाचे योगदान” या विषयावर बोलत होते. तहसीलदार मिलींदकुमार वाघ अध्यक्षस्‍थानी होते.प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विस्‍तार अधिकारी अशोक बिऱ्हाडे, प्रताप महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एस. ओ. माळी, साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. डी. देशमुख, विजयनाना पाटील आर्मी स्‍कुलचे प्राचार्य एस. यू. पाटील, शिवशाही फाऊंडेशनचे अध्यक्ष जयेशकुमार काटे उपस्‍थित होते.

शिवशाही फाऊंडेशनतर्फे आयोजित व्‍याख्यानात ते “भारतीय संविधानाचे योगदान” या विषयावर बोलत होते. तहसीलदार मिलींदकुमार वाघ अध्यक्षस्‍थानी होते.प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विस्‍तार अधिकारी अशोक बिऱ्हाडे, प्रताप महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एस. ओ. माळी, साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. डी. देशमुख, विजयनाना पाटील आर्मी स्‍कुलचे प्राचार्य एस. यू. पाटील, शिवशाही फाऊंडेशनचे अध्यक्ष जयेशकुमार काटे उपस्‍थित होते.

डॉ. पाटील म्‍हणाले, की  संविधान हाच आपला धर्म असून त्‍याचा आदर करा. नागरिकांची कर्तव्य समजून घ्यावी. चांगल्‍या बाजुने उभे राहणे हे विचारी माणसांचे काम आहे. जात निघाली की धर्म निघेल मग मानव जन्‍म सुसह्य होईल. तसेच कोणतीही लग्नपत्रिकेत राजकीय व्‍यक्‍तींना अगोदर स्‍थान असते. त्‍यानंतर शैक्षणिक क्षेत्रातील व्‍यक्‍तींना महत्त्व दिले जाते, ही बाब चुकीची आहे. यात आवश्‍यक वेळी बदल झाला तरच खऱ्या अर्थाने देशाचा विकास होईल. मॅनेज केलेली कोणतीही गोष्ट टिकाऊ नसते. सत्‍य हे नेहमीच सत्‍य असते. हक्कांचा जन्‍म कर्तव्‍यातून होतो. यासाठी प्रत्‍येक नागरिकाने सामाजिक व शैक्षणिक तंदुरुस्‍तीसाठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले. तहसीलदार वाघ म्‍हणाले, की जगातील सर्व लोकशाहीचा अभ्यास करुन डॉ. बाबासाहेबांनी सर्व मुलभूत गोष्टींचा समावेश भारतीय संविधानामध्ये केला. आज आपण मुलभूत हक्कांची मागणी करतो. मात्र, त्‍याचबरोबर मुलभूत कर्तव्‍यांचीही जाणीव प्रत्‍येक भारतीयांनी केली पाहिजे. तरच देशाचा सर्वांगीण विकास होईल. व्‍ही. डी. पाटील यांनी संविधान वाचन केले. विशाल देशमुख यांनी परिचय करुन दिला. डी. ए. धनगर यांनी प्रास्‍ताविक केले. निरंजन पेंढारे यांनी सूत्रसंचालन केले. उमेश काटे यांनी आभार मानले. यावेळी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.

२६/११ च्या हल्ल्यात शाहिद झालेल्या वीर जवानांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन

कार्यक्रमाच्या सुरुवातीला २६/११ च्या हल्ल्यात शाहिद झालेल्या वीर जवानांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले.

या मान्यवरांचा केला गौरव

यावेळी उपक्रमशील शिक्षक दत्तात्रय सोनवणे (पिंगळवाडे), सहायक शिक्षिका दर्शना चौधरी (शिरुड), साने गुरुजी माध्यमिक पतसंस्‍थेच्या नूतन अध्यक्षा सुलोचना पाटील यांचा विशेष गौरव करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *