अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील सावखेडा हद्दीतील नदीपात्रातून अवैधरित्या वाळू वाहतुकीचा तक्रारी अर्ज देवून देखील कार्यवाही न केल्यामुळे सरपंच कोकीळाबाई आत्माराम अहिरे यांनी येथील प्रांताधिकारी व तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात मौजे सावखेडा ता.अमळनेर येथील ग्राम पंचायत हद्दीतील नदीपात्रातून अवैधरित्या वाळू वाहतुक करुन धर्मेश पाटील व वाळूठेकेदार मोठ्या प्रमाणावर वाळूसाठा करीत आहे. तरी आमच्या ग्रा.पं. कडून त्यांना वरील संदर्भान्वये नोटीसा दिल्या. परंतु सदर वाळू वाहतूक करणारे व ठेकेदार हे एकण्याचा मनस्थितीत नाही. तरी त्या बाबत आम्ही जिल्हाधिकारी, तहसिलदार व आपल्या कार्यालयाला लेखी तक्रारी अर्ज देवुन देखील अजून कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली नाही. सदर व्यक्ती कोणालाही न जुमानता नदीपात्रातुन अवैधरित्या वाळू वाहतुक करीत आहे. सदर पत्राची वरीष्ठ अधिकारींनी दखल न घेतल्या मुळे बुधवारी नाईलाजास्तव संवैधानिक पध्दतीने उपोषणास बसावे लागत असल्याचे निवेदन सरपंच कोकिळाबाई आत्माराम अहिरे यांनी उपोषण सुरू केले आहे.