आदिवासी शिष्टमंडळाने आमदार अनिल पाटील यांना दिले मागण्यांचे निवेदन

अमळनेर (प्रतिनिधी) आदिवासी शिष्टमंडळाकडून अमळनेर तालुक्यातील आदिवासींच्या समस्या आमदार अनिल पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे मांडण्यात आल्या.  निवेदनात म्हटले आहे की, अमळनेर तालुक्यातील सर्व आदिवासी तथा आदिवासी क्रांती दल शाखा अमळनेरच्या वतीने, अशी विनंती करतो की, आमच्या आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक प्रगतीसाठी सदर प्रकल्प स्थापन करण्यात आला आहे, परंतु यावल प्रकल्प अमळनेर तालुकापासून 80 ते 85 किलोमीटर लांब असल्याने तसेच तसेच आदिवासी समाजाजवळ यावल येथे पोहोचणे खूप खर्चिक आहे,  तसेच आदिवासी समाज हा हात मजुरी,शेत मजूर  असल्यामुळे ज्यांना शक्य होत नाही, त्यामुळे आदिवासी विकास प्रकल्पाच्या विविध योजनांच्या आम्हाला लाभ मिळत नाही, अशा अनेक प्रकारच्या समस्या तालुक्यातील आदिवासींना असून  आदिवासी प्रकल्प यावल यांचा आठवड्यातून एक दिवस अमळनेर येथे टेबल लावण्यात यावा, जेणेकरून विविध योजनांचा लाभ आदिवासींना घेता येईल, व आदिवासींच्या सर्वांगीण विकास साधता येईल. यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष आप्पा दाभाडे, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण भाऊ बैसाणे, संतोष संदानशिव, गोरख साळुंखे, मनोज पवार, अनिकेत ब्रम्हे, राजेंद्र चव्हाण, रामदास ढालवाले, प्रकाश भिल, धुलसिंग भिल, अर्जुन भिल, मनोज पारधी, भाईदास सोनवणे, बाळू पारधी, प्रकाश पारधी, रवींद्र पवार, रतिलाल पारधी, सुनील पारधी, ज्योतीबाई पारधी, जयश्री पारधी, मनीषा पारधी, रणूबाई पारधी, निशा पारधी, पार्वती बाई पारधी, संगीताबाई पारधी आदी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *