अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील बहादरवाडी येथे चक्क लग्नातून दोन अल्पवयीन मुलींना फुस लावून पळवल्याची घटना १० रोजी घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १० रोजी त्यांच्या पुतण्याचे लग्न असल्याने ते लग्न कार्यात मग्न होती. यावेळी त्यांची १४ वर्ष १ महिना वय असलेली मुलगी व १५ वर्ष ८ महिने वय असलेली तिची मैत्रीण आम्ही नवरदेवजवळ पारावर जातो म्हणून बाहेर पडल्या. मात्र तीन वाजता लग्न लागल्यानंतर ही त्या दिसून आल्या नाहीत. त्यामुळे दोन्ही मुलींच्या आईवडिलांनी आजूबाजूच्या गावात व आपापल्या नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र कोणताही तपास न लागल्याने त्यांना कोणीतरी फूस लावून पळवून नेल्याची खात्री झाली. त्यामुळे त्यांनी अमळनेर पोलिसांत धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.