अमळनेरात प्रति व्यक्ती एकही झाड नसल्याने उन्हाळा होतोय असाह्य!

पालिकेने पावसाळा सुरू झाल्याने तातडीने वृक्षरोपण  मोहीम हाती घेण्याची मागणी

 

अमळनेर (प्रतिनिधी) शहरात वाढत्या सिमेंटच्या जंगलामुळे उन्हाळा असाह्य होत आहे. शहराच्या लोकसंख्येनुसार प्रती व्यक्ती २८ एवढी वृक्षांची संख्या असणे आवश्यक असताना एक झाडही येत नाही. त्यामुळे पालिकेने पावसाळा सुरू झाल्याने तातडीने वृक्षरोपण  मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी मुख्याधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

मुख्याधिकारी यांना सोमवार ९ जून २०२५ रोजी वृक्ष लागवडी संधर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अमळनेर शहर व परिसरात सन – २०२५ च्या उन्हाळ्यात उष्णतेने इतर शहरांच्या प्रमाणात उच्च पातळी गाठली होती.  कारण मागील काही वर्षात अमळनेर शहरात बांधकामे व रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे तापमाणात मोठी वाढ होत आहे. तर शासनाच्या वतीने सन २०११ या वर्षी केलेल्या जनगणनेनुसार अमळनेर शहराची लोकसंख्या ९५,००० एवढी होती आणि ती मागच्या १५ वर्षात मोठ्या प्रमाणत वाढली देखील आहे. तसेच अमळनेर नगरपरिषदेच्या वतीने सन २०२२ या वर्षी शहरातील वृक्षांची मोजणी केली असता ती फक्त ७३,५३३ एवढी आहे. आणि ही बाब अमळनेर शहरातील उष्णता वाढीसाठी व नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकेदायक आहे. जगात सरासरी प्रती मनुष्य ४२२ एवढी वृक्षांची संख्या असून भारतात ती प्रतिव्यक्ती २८ एवढी आहे आणि अमळनेर शहरात तर ती प्रतीव्यक्ती १ देखील नसल्याचे वरील आकडेवारी वरून लक्षात येते. तरी आपण अमळनेर शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा विचार करत वृक्ष लागवडीवर भर देणे गरजेचे आहे, अशी मागणी केली आहे. यावेळी अक्षय चव्हाण, दर्पण वाघ यांच्यासह काही नागरिक देखील उपस्थित होते.

 

येथे करता येईल वृक्षारोपण

 

अमळनेर नगरपरिषदेच्या वतीने सध्या सुरु असलेल्या डी.पी.( ८० फुटी ) रोड मधील दुभाजक व रस्त्याच्या दुतर्फा तसेच शहरातील इतर भागात व खुल्या भूखंडात तात्काळ वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घ्यावा, जेणे करून या पावसाळ्यात त्यांची चांगली वाढ होईल आणि भविष्यात अमळनेर शहरातील तापमान कमी होऊन नागरिकांचे आरोग्य सुधृढ राहण्यास त्यांची मदत होईल, असे ही निवेदनात म्हटले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *