अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात रविवारी रात्री तीन वाजेच्या सुमारस वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. यामुळे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तर यात्रेतील व्यवसायिकांचीही तारांबळ उडाली.
गेल्या दोन महिन्यांपासून सूर्य आग ओतत आहे. तर आता मे हिटने अंगाची लाहीलाही होत आहे. तापमान ४४ अंशावर पोहचले आहे. त्यामुळे या वाढत्या तापमानाचा पाऱ्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यात रविवारी हवमान विभागाने यलो अर्लट जारी केल्याने पावसाचा अंदाज वर्तवला होता. रविवारी रात्री तीन वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. शाम बोरच्या आकारीची ही गार असल्याने तीचा मारा मोठ्याप्रमाणवर होती. रात्र असल्यामुळे नागरिक सुदैवाने वाचले. पण सध्या बोरी पात्रात यात्रोत्सव सुरू झाल्याने तेथील व्यवसायिक आणि काही भाविकांना त्याचा फटका बसला आहे. शेतीचेही नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.