अमळनेर (प्रतिनिधी) येथील राजे शिवाजी गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी राबवलेल्या उपक्रमाचे एका भाविकाने उत्स्फूर्तपणे कौतुक केले आहे.
आपल्या लाडक्या गणपती बाप्पासाठी रात्रंदिवस राबणारे मित्रमंडळी यांच्या हाताने गणपती बाप्पाला शेवटच्या दिवशी निरोप देताना कालच्या जो कार्यक्रम झाला तो उत्तम होता. प्रताप आबा यांच्या अध्यक्षतेखाली गिरीश सोनवणे, विजय बडगुजर, सागर शिंपी ,मुन्ना बाविस्कर, बबलू दादा , कुणाल पारधी, हेमत चौधरी,पवन शिंपी, गणेशजी, भूपेंद्र पाटील, पवन चौधरी, किशोर पाटील, विक्रम पाटील व इतर सर्व कार्यकर्ते यांनी दहा दिवसाच्या गणेशोत्सवात वेगवेगळ्या मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले. यामध्ये बालगोपाल, महिला मंडळ ज्येष्ठ नागरिक असे सर्वजण उत्सपूर्तपणे सहभागी झाले. तसेच महिलांसाठी मनीषाताई शिंपी यांनी सर्व महिलांच्या एकसारखा ड्रेसकोड अशा बारीक सारीक संकल्पना तसेच गावातील असो वा बाहेरगावी असलेल्या सर्व महिलांना देखील फोन करून कार्यक्रमात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले. त्याच प्रमाणे बाहेर गावी असलेल्या व्यक्तीला सत्यनारायणाच्या पूजेला बोलावले. बबलू दादा यांचे नियोजन कॉलनीतील ज्येष्ठ महिला, पुरुष ,मंडळाचे सभासद हाताने बालगोपाळांच्या सत्कार, बक्षीस देणे, प्रताप आबा यांच्याकडे प्रोत्सात्मक रोख बक्षीस असो तसेच कपड्यांपासून ड्रेस मेकअप अशा अनेक गोष्टींमध्ये सहभाग नोंदविणे आणि एकजूट करण्याची जी क्षमता अध्यक्षांनी व संस्कृती निर्माण केली आहे ही संकल्पना कौतुकास्पद आहे.