खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

प्रताप महाविद्यालयात दोन दिवस राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन प्रश्नमंजुषा स्पर्धा

अमळनेर (प्रतिनिधी) राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) आणि प्रताप महाविद्यालयाचे करियर कौन्सलिंग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रताप महाविद्यालयात दि. 5  व 6 सप्टेंबर रोजी पूज्य साने गुरुजी राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेत प्रवेश घेण्याची अंतिम तारीख 30 ऑगस्ट होती, त्याप्रमाणे आतापर्यंत या स्पर्धेत राज्यातील 35 महाविद्यालयाने त्यांच्या प्रवेश पत्रिका पाठविलेल्या आहेत. ही स्पर्धा निःशुल्क असून विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिले जाणार आहेत. गेल्या नऊ वर्षापासून सातत्याने सुरू असलेल्या आणि महाराष्ट्रात गाजलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन प्रताप महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रतापियन यशपाल  पवार , धनंजय कोळी आणि राजश्री पाटील यांच्या हस्ते होणार आहे, तर या समारंभाचे अध्यक्ष स्थान प्रताप महाविद्यालयाचे कार्याध्यक्ष डॉ. संदेश गुजराथी भूषविणार आहेत. त्यानंतर प्रश्न मंजुषा स्पर्धेची पहिली फेरी दिवसभर होईल. दुसऱ्या दिवशी या स्पर्धेच्या दोन फेऱ्या घेऊन  समारोप समारंभात या स्पर्धेचा निकाल घोषित करून बक्षीस दिले जाईल. प्रथम10000 रुपये, द्वितीय 7000 रुपये, तृतीय 5000 रुपये आणि उत्तेजनार्थ पहिले 2000 रुपये, उत्तेजनार्थ दुसरे 1000 रुपये बक्षीस दिले जाणार आहे.

यासह सर्व विजेत्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र दिले जाणार आहेत. सलग दोन दिवस चालणाऱ्या या पूज्य सानेगुरुजी प्रश्नमंजुषा स्पर्धेला खानदेश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ.संदेश गुजराथी, कार्योपाध्यक्ष सी ए नीरज अग्रवाल आणि महाविद्यालयाचे प्राचार्य तथा संस्थेचे चिटणीस डॉ. अरुण. बी.जैन,सह सचिव डॉ.धिरज वैष्णव यांचे मार्गदर्शन लाभत आहे. प्रस्तुत दोन दिवसीय प्रश्न मंजुषा स्पर्धेचे लाभ अधिकाधिक विद्यार्थ्यांनी घ्यावे, असे आवाहन करिअर कौन्सलिंग सेंटरचे प्रमुख डॉ.विजय तुंटे, स्पर्धेच्या संयोजिका प्रा.वृषाली वाकडे यांच्यासह सर्व आयोजन समितीने केले आहे.

 

बुद्धी मापन स्पर्धेतील विजेत्या स्पर्धेकांचा ही होणार सन्मान

 

या समारंभात राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान आणि मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने  पर्यावरण या मुख्य संकल्पनेला अनुसरून दिनांक 14 ऑगस्ट रोजी घेतलेली निबंध लेखन स्पर्धा आणि 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य ठेवून करियर कौन्सिलिंग सेंटर यांनी घेतलेली सामान्य बुद्धी मापन स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकाचे वितरण केले जाणार आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button