खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

वाघोदे येथे कर्जबाजारी आणि ओला दुष्काळी परिस्थितीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील वाघोदे येथील शेतकऱ्याने शेतीमुळे झालेले कर्ज व यावर्षी ओल्या दुष्काळी परिस्थितीला  कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केली.घटना दि.30 रोजी घडली.

तालुक्यातील वाघोदे येथील शेतकरी ईश्वरलाल चिंधा पाटील (वय 46) यांनी  27 रोजी घरी त्यांनी विषारी द्रव्य प्राशन केल्याने त्यांना धुळे येथे हलविण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान दि 30 रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरीबीची असून घरातील  कमावता व्यक्ती गेल्याने कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. त्यांच्यावर विका सोसायटी आणि सहकार सोसायटी व इतर हात उसनवारीचे कर्ज होते. या कुटुंबास त्वरित शासनाकडून  आर्थिक मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मयताच्या पश्चात पत्नी,दोन मुली एक मुलगा असा परिवार असून सदर घटनेबाबत धुळे पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button