खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यातील केळीला फळाचा दर्जा मिळावा : खासादर स्मिता वाघांची मागणी

अमळनेर (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यातील केळी पिकाला फळाचा दर्जा मिळावा अशी मागणी खासदार स्मिता वाघ यांनी संसदेत नियम ३७७ द्वारे केली.

जिल्ह्यातील तसेच राज्यातील प्रमुख नगदी पीक म्हणून केळी पिकाला बघितले जाते ह्या पिकाला फळाचा दर्जा नसल्यामुळे ह्या पिकांच्या उत्पादक शेतकरी वर्गाला  निर्यात,शासकीय सवलती, पीक विमा तसेच बाजारभावात मोठ्याप्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागत होते.त्यामुळे केळी  पिकाला फळाचा दर्जा मिळावा ही मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात आली होती.ही मागणी गेल्या बऱ्याच दिवसापासून शासनाकडे प्रलंबित असल्याचे खा.स्मिता वाघ यांनी शासनाच्या लक्षात आणून दिले.ह्या पिकाला फळाचा दर्जा मिळाल्यानंतर ह्या केळी उत्पादक शेतकरीवर्गाचे आर्थिक नुकसान कमी होणार आहे. तसेच याबाबत लवकरच निर्णय घेण्यात यांवा अशी मागणी खा.वाघ यांनी केली.  दरम्यान संसदेत जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण कृषी प्रश्नाला वाचा फोडल्याने ह्या मागणीला आता यश येणार असल्याने खा.स्मिता वाघ यांचे केळी उत्पादक परिसरात आभार व्यक्त होत आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button