खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

शहरातील ढेकू रोड परिसरात पाणी पुरवठा झाला विस्कळीत

साहित्य संमेलनाला पुरवठा करावा लागल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचा जावई शोध

 

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील ढेकू रोड परिसरात पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. चार दिवसा आड झालेला पाणी पुरवठा सहा दिवस उलटूनही नगरपालिका नागरिकांना पाणी देऊ शकत नसल्याने पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. दरम्यान अखिल भारतीय साहित्य संमेलनाला अतिरिक्त पाण्याचा पुरवठा करावा लागल्यामुळे पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याचा जावई शोध, नगर पालिकेने लावला आहे. याबाबत पाणीपुरवठा अभियंता प्रवीण बैसाने याना विचारले असता त्यांनी शेड्युल काय आहे, हे मला माहित नाही, लक्ष्मीनगर भागातील व्हॉल्व्ह मन यांना शेड्युल तयार करायचे सांगितले असल्याचे बेजबाबदार उत्तर दिले. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच अमळनेरात पाणी बानी सुरू झाली आहे याचाच अर्थ पाणीपुरवठा विभागाने पाण्याचे नियोजन केले नव्हते का? साहित्य संमेलनाला पाणी पुरवठा करायचा होता तर पर्यायी व्यवस्था करणे अपेक्षित होते की नाही,सर्वाधिक कर भरणाऱ्या नागरिकांनी, पाणी मिळाले नाही म्हणून  ढेकू रोड वासीयांनी पालिकेवर हंडा मोर्चा आणावा का असा संतप्त सवाल विचारला जात आहे,पाणी पुरवठा अभियंता आणि मुख्याधिकारी यांनी पाणी नियोजनाचे अपयश व्हॉल्व्ह मन ढकलून पाणी पुरवठा सुरळीत होणार नाही,  एरव्ही फेब्रुवारी, मार्च महिन्यात जळोद डोहातले पाणी अटल्यानंतर पाण्याचे आवर्तन घ्यावे लागत असे. तापी नदीपात्रात जळोद इंटेकवेल जवळ पाणीसाठा शिल्लक आहे. फक्त त्याचे नियोजन करणे गरजेचे आहे,नियोजन ढासळल्यास पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो, संभाव्य पाणी टंचाई वर मात करण्यासाठी कलाली डोहातून पाणी  पुरवठा सुरू  केल्याचे बैसाने यांनी सांगितले, त्यासोबत पालिकेने गंगापुरी डोहातून चारी खोदून पाणी जळोद डोहातून आणावे तरच शहराला पाणी पुरवठा व्यवस्थित होऊ शकतो अन्यथा पालिकेवर दररोज वेगवेगळ्या भागातून हंडा मोर्चा आल्याशिवाय राहणार नाही . दरम्यान तांत्रिक कारणामुळे पाणी पुरवठा विस्कळीत झाल्यास पालिकेने पर्यायी व्यवस्था उभी करून पालिकेने पाणी पुरवठा केला पाहिजे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

 

पाणी जपून वापरावे

 

सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. आता पाण्याचे बाष्पीभवन अधिक होते. यामुळे भविष्यात पाणी टंचाई भेडसावू नये म्हणून पाणी जपून वापरा अन्यथा उधळपट्टी करणाऱ्यांना दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

प्रवीण बैसाने  पाणीपुरवठा अभियंता पालिका

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button