गांधी विचार परीक्षेत लोकमान्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जिल्ह्यातून पटकावला तिसरा क्रमांक

अमळनेर (प्रतिनिधी) गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे दरवर्षी घेतली जाणारी गांधी विचार संस्कार परीक्षेत लोकमान्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले.

यात वैभवी सुनिल महाजन व नंदिनी विजय सोनार या विद्यार्थींनींनी जळगाव जिल्ह्यात तृतीय क्रमांक पटकावला आहे. त्यांना विद्यालयाच्या शिक्षिका रेखा कांबळे यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या या यशाबद्दल मुख्याध्यापक मनोहर महाजन तसेच सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले आहे. सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *