अमळनेर (प्रतिनिधी) येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पूर्व सांस्कृतिक कार्यक्रमात रंगतदार कार्यक्रमांनी मोठी धम्माल केली,यावेळी गोंधळ नृत्य,कथ्यक नृत्य,भरत नाट्यम व सुरेल गीताच्या कार्यक्रमाने उस्फुर्त दात मिळवली. तसेच या कार्यक्रमाने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले. प्रताप महाविद्यालयातील बालकवी ठोंबरे सभागृहात दि 29 ला जळगांवच्या आर्या शेंदूर्णीकर यांनी बहिणाबाईंची कविता – माझी माय सरसोती, “अगं नाच नाच नाच राधे उडवू या रंग”.”श्रीरामाच्या पूजेसाठी आज अयोध्या सजली” अवघे गर्जे पंढरपूर” या गीतांवर सुंदर कथक नृत्य सादर केले.यानंतर सुरेल गीतांचा कार्यक्रम “मराठी पाऊल पडती पुढे” सादर करण्यात आला. तर दि. 30 रोजी नयना कुलकर्णी व रुपाली राजपूत समूहाने “आमची माती आमची संस्कृती”वर आधारित गोंधळ,गीतावर सुंदर नृत्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली.तसेच धनगर नृत्य,मंगळागौर,लेझीम,वासुदेव आदी नृत्यही बहारदार झालीत.यानंतर बालचंद्रन नारायणन चेन्नरा यांचे मार्गदर्शनात कानुश्री संगीत विद्यालय धुळे च्या मुलींनी भरतनाट्यम नृत्य सादर केले.या कार्यक्रमाचे सूत्र संचलन संदीप घोरपडे यांनी केले.
अमळनेर महिला मंच ने ” सूर तेच छेडता”- या अंतर्गत पूर्वा कुलकर्णी, सौ मनीषा भांडारकर, शुभांगी खंडाळे,राजश्री पाटील, सरोज देसाई यांनी अप्रतिम मराठी गीते गायली . त्यांना किशोर देशपांडे (कीबोर्ड), नितीन गुरव(ढोलकी), देवांशु (तबला), विजय शुक्ल( कोंगो),कार्तिक गुरव(ऑक्टोपँड) यांची साथ लाभली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पूजा शहा व करुणा सोनार यांनी केले, सोनार महिला मंडळाने “रामधून वर नृत्य सादर केले.