मारवड येथील सु. हि. मुंदडे हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा तीन दशकांनी रंगला मेळावा

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मारवड येथील सु. हि. मुंदडे हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल तीस वर्षांनी एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा दिला.

   सोशल मिडियाच्या माध्यमातून ग्रुप तयार करत तब्बल तीस वर्षानंतर हे माजी विद्यार्थी एकत्र आहे. सु.हि. मुंदडे हायस्कूलच्या सन १९९४-९५ ची इयत्ता दहावीची बॅच व सन १९९६-९७ ची इयत्ता बारावीची बॅचचा स्नेह मिलन सोहळा पार पडला.  सु. हि.मुंदडे हायस्कूल मारवडच्या प्रांगणात हा सोहळा झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्राचार्य एस. एम. पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून शांताराम साळुंखे, हरिभाऊ मारवडकर, जगदीश पाटील, ए डी पाटील, बी. एस. पाटील, ए बी पाटील, विजय सूर्यवंशी, एल जे चौधरी, गोविंद साळुंखे, सी वाय पाटील, संजय साळुंखे ,राजेंद्र सोनवणे, विक्रम शिरसाठ, कांतीलाल पाटील व मान्यवर गुरुजन उपस्थित होते.  गतकाळात व अकाली निधन झालेले – शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व वर्ग मित्रांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली. यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. “तब्बल तीस वर्षानंतर शालेय मित्रांच्या भेटीची ओढ प्रत्येकाला होती. जीवनात सुख आणि दुःखामध्ये आपले मित्र-मैत्रिणीच आपल्याला आधार असतात म्हणून मैत्रीची नाळ आयुष्याच्या शेवटपर्यंत तुटू देऊ नका आयुष्यभर मैत्री जोपासा व एकमेकांना सुखदुःखात साथ द्या आणि जीवनाचा आनंद घ्या” असे प्रतिपादन अध्यक्षीय भाषणातून एस. एम. पाटील यांनी केले. याप्रसंगी ए. डी. पाटील, ए .बी. पाटील, जगदीश साळुंखे, लोटन चौधरी, गोविंद साळुंखे, मनोहर पाटील, हरिभाऊ मारवडकर या गुरुवर्यांनी मनोगत व्यक्त करून उपस्थित सर्व विद्यार्थी मित्र-मैत्रिणींच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. उपस्थित विद्यार्थ्यांपैकी महेंद्र पवार, महेंद्र जाधव, नितीन मुंदडा, शशिकांत पाटील, संतोष बोरसे व प्रदीप चौधरी यांनी मनोगताद्वारे शाळेतील शिक्षकांची कडक शिस्त, अभ्यास, खेळ, मित्रांच्या गमती जमती या सर्व आठवणींना उजाळा दिला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध पदांवर यश निवड झालेल्या गुणवंत विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचा सत्कार करण्यात आला. सायंकाळी सर्वांनी पुन्हा भेटूया असा निर्धार करत गुरुवर्यांचा आशिर्वाद व निरोप घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोर चौधरी, सूत्रसंचलन ललिता पाटील व प्रदीप चौधरी यांनी तर आभार प्रदर्शन प्रशांत साळुंखे यांनी केले. वंदे मातरम गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महेश साळुंखे, भरत पाटील, विनय साळुंखे, उमेश पाटील, प्रदीप साळुंखे, अरुण साळुंखे, पुष्पांजली शिंदे, मीना पाटील, प्रदीप चौधरी, ललिता पाटील, स्वाती सिद्धपुरे, भारती शिंदे, शशिकांत पाटील, वसंत सैंदाणे यांनी सहकार्य केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *