खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

२००६ साली एक महात्म्याच्या टिपणीमुळे पाडळसरे धरणाचे संकल्प चित्र बदलवण्याचा पाठवला होता प्रस्ताव

येणाऱ्या अर्थसंकल्पात १५० कोटिपर्यंत निधी मिळू शकतो

 

मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी पाडळसरे धरणाची पहाणी करून दिली माहिती

 

अमळनेर (प्रतिनिधी) २००६ साली एक महात्म्याने टिपणी मारून ठेवली होती की महापूर आला की पाडळसारे धरणाचे गेट बंद असले की ते वाहून जातील म्हणून संकल्प चित्र बदलवण्याचा प्रस्ताव पाठवला होता. मात्र महापूर पावसाळ्यात येतो, तेव्हा धरणाचे गेट उघडे असतात. तर मग गेट कसे वाहतील असा सवाल करून त्याची टिपणी चुकीची असल्याचे निदर्शनास आणून दिले. एसएफसीची मान्यता घ्यावी लागेल. येणाऱ्या अर्थसंकल्पात १५० कोटिपर्यंत निधी मिळू शकतो. शेतापर्यंत पाणी कसे न्यायचे याचा सर्वे सुरू झाला आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली. धरणाच्या १५ प्रस्तंभाची उंची सहा मीटरने वाढली आहे.  उर्वरित ८ प्रस्तंभांचे काम चालू आहे. १०० फूट उंचीपर्यंत काम होऊन त्यांनतर गेट बसवण्याची प्रक्रिया होईल. या कामाची मंत्री अनिल पाटील यांनी पाहणी केली. यावेळी  ते पुढे म्हणाले की शिंदखेडा तालुक्यातील बुराई उपसा सिंचन योजनेला महिनाभरात मंजुरी मिळवेल. जनतेने नौटंकी करणाऱ्याच्या मागे जाऊ नये जो लोकप्रतिनिधी इमानदार असेल त्याच्या मागे रहा.

 

धरण पूर्ण करण्याची तरतूद, पण पाणी उपसा कसा करायचा याची तरतूद नव्हती

 

गेल्या १४ वर्षात निम्न तापी प्रकल्प पाडळसरेच्या सुप्रमासाठी कोणतेही प्रयत्न झाले नाहीत. तसेच २०१२ ते २०२० पर्यंत नदी पात्रात कोणालाही काम करायला परवानगी नव्हती.  संपूर्ण तापी नदीवर कोणत्याच धरणाच्या प्रकल्पात उपसा सिंचन योजनांच्या खर्चाला मंजुरी नाही.सर्वात मोठी अडचण अशी होती की धरण पूर्ण करण्याची तरतूद होती पण पाणी उपसा कसा करायचा याची तरतूद नव्हती असा गौप्यस्फोट ही मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी पाडळसरे येथे धरणाची पाहणी करताना केला.

 

अनिल पाटलांनी २०१९ पूर्वीच्या चुका आणि बारकाव्यांचा केला अभ्यास

 

 यावेळी तांत्रिक सल्लागार प्रकाश पाटील म्हणाले की मोठा प्रकल्प राज्य शासनाच्या निधीतून कधीच पूर्ण होऊ शकत नाही. १४ वर्षानंतर चवथी सुप्रमा मिळाली.  शासकीय खर्चाने उपसा सिंचन योजना करण्याचा निर्णय झाला आहे. अनिल पाटलांनी २०१९ पूर्वीच्या चुका आणि बारकाव्यांचा अभ्यास केला. वन विभाग, पर्यावरण, संकल्प चित्र आदी मान्यता बाकी होत्या. शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहचविण्याचा खर्चाचा समावेश प्रकल्पात नव्हता. तापीची डावी बाजू अवर्षणप्रवणग्रस्त आहे. या बाबींचा समावेश नवीन सुप्रमात करण्यात आला.

 

धरणाचे पूर्ण काम २०२५  ला होईल पूर्ण

 

१ लाख एकर पेक्षा जास्त जमिनीला फायदा होणार आहे. साडे चारशे कोटी २०१९ पर्यंत खर्च झाले आज साडे सातशे कोटी खर्च झाले आहे. धरणाचे पूर्ण काम २०२५  ला पूर्ण होईल. पातळीपासून १०० फूट उंच प्रस्तंभ होतील ,९२ किमी बँक वॉटर , बोरी नदीत २० किमी , नद्या नाल्यात २०० किमी पाणी साचणार आहे.

 

भाजपच्या नेत्यांनी आणले अडथळे 

 

जनआंदोलन समिती प्रमुख सुभाष चौधरी म्हणाले की भाजपच्या नेत्यांनी अडथळे आणले. अजित पवारांना सांगा की तुम्ही २०१५ पर्यंत धरण पूर्ण करणार होते. तर भाजप तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील धरण महायुतीच्या काळातच होईल ,केंद्राच्या माध्यमातूनच धरण पूर्ण होईल.   प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील यांनी केले. सूत्रसंचालन विनोद कदम यांनी केले. आभार महेंद्र बोरसे यांनी मानले.

 

सात्री ग्रामस्थांतर्फे मंत्री अनिल पाटील यांचा सत्कार

 

यावेळी सात्री ग्रामस्थांतर्फे गावाला ७५ वर्षांनंतर रस्ता मंजूर केल्याबद्दल मंत्री अनिल पाटील यांचा सत्कार करण्यात आला. बाजार समिती सभापती अशोक पाटील ,माजी  जिल्हा परिषद सदस्य जयश्री पाटील , प्रा. सुरेश पाटील, सरपंच शुभांगी पाटील , अनिल शिसोदे, मंगळ ग्रह संस्थांचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील , माजी पंचायत समिती सभापती श्याम अहिरे, माजी जिप सदस्य ऍड. व्ही. आर. पाटील , संचालक समाधान धनगर , भाईदास भिल , नरेंद्र संदानशीव, प्रताप शिंपी ,  गिरीश पाटील , राजेश पाटील ,डॉ अशोक पाटील , मुख्तार पाटील , सुरेश पाटील , एल टी पाटील ,महेंद्र पाटील ,शिवाजीराव पाटील,गौरव पाटील, सात्री पोलीस पाटील विनोद पाटील  यांच्यासह अनेक कार्यकर्ते हजर होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button