अमळनेर (प्रतिनिधी) विविध प्रलंबित मागण्यांसाठी रेशन दुकानदारांनी एक जानेवारीपासून रेशन बंद आंदोलन पुकारले आहे जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत धान्य न उचलणे आणि वितरण न करण्याचा निर्णय घेतला आहे.
रेशन दुकानदारांनी शासनाकडे विविध मागण्या व निवेदने दिले आहेत. तरी शासनाने कोणतीही दखल न घेतल्यामुळे एक जानेवारीपासून अमळनेर तालुक्यातील अखिल महाराष्ट्र राज्य व केरोसीन परवानाधारक संघटनेतर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा दिला आहे. निवेदनावर संघटनेचे मंडळ तालुका अध्यक्ष प्रवीण गोसावी, शहराध्यक्ष दिलीप सैनानी, राज्य प्रतिनिधी महेंद्र बोरसे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.