खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

मंगरूळ ते जवखेडा रस्त्याचे वाजले तीन तेरा, खड्ड्यांमुळे प्रवास करणे झाले जीव घेणे

अमळनेर (प्रतिनिधी) नेहमी वर्दळ असलेला तालुक्यातील मंगरूळ ते जवखेडा रस्त्याचे तीन तेरा झालेले आहेत. त्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे.
या रस्त्याने जाताना मंगरूळ गावामधून मोठ्या प्रमाणात मोटरसायकल व मोठ्या वाहनांना कसरत करावी लागत आहे शनि महाराज मंदिरापासून तर जवखड्यापर्यंत जाताना अक्षरशः कसरत करून जावे लागते. एवढे खाच खड्डे पडलेले असून गाडीचे व शरीराचे फार मोठ्या प्रमाणामध्ये झीज होते. डबल सीट चालवणाऱ्यांना तर त्यांच्या हाल विचारूच नका. हे सर्व असताना अधिकारी मंत्री अधिकारी यांच्या रस्त्यावरून गाड्या जात असताना किरकोळ डागडुजी सुद्धा नाल्यावरची फरशी व रस्त्याची दुरुस्ती होत नाही. प्रशासनने लवकरात लवकर रस्त्याकडे लक्ष द्यावे ही मागणी परिसरातील लोक करीत आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button