अमळनेर (प्रतिनिधी) नेहमी वर्दळ असलेला तालुक्यातील मंगरूळ ते जवखेडा रस्त्याचे तीन तेरा झालेले आहेत. त्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे.
या रस्त्याने जाताना मंगरूळ गावामधून मोठ्या प्रमाणात मोटरसायकल व मोठ्या वाहनांना कसरत करावी लागत आहे शनि महाराज मंदिरापासून तर जवखड्यापर्यंत जाताना अक्षरशः कसरत करून जावे लागते. एवढे खाच खड्डे पडलेले असून गाडीचे व शरीराचे फार मोठ्या प्रमाणामध्ये झीज होते. डबल सीट चालवणाऱ्यांना तर त्यांच्या हाल विचारूच नका. हे सर्व असताना अधिकारी मंत्री अधिकारी यांच्या रस्त्यावरून गाड्या जात असताना किरकोळ डागडुजी सुद्धा नाल्यावरची फरशी व रस्त्याची दुरुस्ती होत नाही. प्रशासनने लवकरात लवकर रस्त्याकडे लक्ष द्यावे ही मागणी परिसरातील लोक करीत आहे.