खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

अमळनेर तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करा, अन्यथा राष्ट्रवादी उतरणार रस्त्यावर

प्रांताधिकारी यांना दिले मागण्यांचे निवेदन

अमळनेर (प्रतिनिधी) यंदा पावसाने दडी मारल्याने अमळनेर तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
प्रांताधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या वर्षी पाऊसाला उशीरा सुरवात झाली. त्यामुळे खरीप हंगामाला आणि पेरणीला उशिरा सुरुवात झाली. तसेच मागील सुमारे 25 दिवसापासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे येणारे खरीप हंगामाचे उत्पन्नात साशंकता असल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. तसेच तोंडी आलेला घास हातातुन गेल्याने तालुक्यातील शेतकरी हे हवादील झालेले आहेत. तसेच आजपासूनच तालुक्यातील आज गावांचा पिण्याचे पाण्याचे संकट देखील आहे. तसेच पुढील दिवसात गुरांना चाऱ्यासाठी उपाय योजना करावी व पीक विमा 40% ची रक्कम लगेच असे जाहीर करून अदा करावी व विद्याथ्र्यांची शैक्षणिक शिक्षणाची फी पुढे माफ करावी तसेच खाजगी कोचिंग च्या संचालकांना 50% फी घेण्याचे आदेश दयावे व चालू वर्षाचे पीक कर्ज माफ करान्यासाठी अमळनेर तालुका दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी केली आहे. अन्यथा राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षातर्फे रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशारा दिला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन बाळु पाटील, शहरध्यक्ष शाम जयवंतराव पाटील, प्रदेश सरचिटनिस तिलोत्तमा पाटील, प्रदेशअध्यक्ष ग्रंथालय उमेश पाटील, प्रदेश सचिव ग्रंथालय रिता बाविस्कर, डॉ. किरण पाटील, प्रा. अरुन शिंदे, मनोहर पाटील,सचिन पाटील, दर्पण वाघ, सनी गायकवाड, असंख्य कार्यकर्त्यांनी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button