अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पातोंडा ग्राम पंचायतीने ग्रा.पं.मासिक सभेत ठराव राकेश विलास पाटील या उमेदवाराची ग्रा.पं.कारकून कम लिपिक म्हणून केलेली पदभरती बेकायदेशीर असल्याची ठरवत गटविकास अधिकारी अधिकारी विशाल शिंदे यांनी सदर भरती रद्द केली आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते केतन ढीवरे यांनी सदर झालेली बोगस भरती माहिती अधिकारातून उघडकीस आणली होती. आणि त्याअनुषंगाने त्यांनी सदर पदभरती कोणतीही लेखी परीक्षा न घेता भरती अवैधरित्या करण्यात आली असून ती रद्दबातल करण्याच्या मागणीचे निवेदन गटविकास अधिकारी विशाल शिंदे,मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले होते. त्यानुसार गटविकास अधिकारी यांनी दि.18 एप्रिल रोजी ग्राम पंचायतीला प्रत्यक्ष भेट देऊन तक्रारीच्या अनुषंगाने केली होती. नोकर भरती प्रक्रियेची कागदपत्रांची पाहणी केली असता राकेश पाटील याची ग्रा.पं. कर्मचारी म्हणून भरती करताना नियमानुसार कार्यवाही केल्याचे दिसून येत नसल्याचे उघड झाले असून सदर भरती ही ग्राम पंचायत पदाधिकारी यांनी वशिलेबाजी करत भरती केली होती हे स्पष्ट होऊन सदर भरती रद्दबातलचे पत्र नुकतेच ग्राम पंचायतीला प्राप्त झाले आहे. आणि सदर भरती प्रक्रिया नवीन करताना शासनाच्या निर्णयाला अधीन राहूनच करण्यात यावी असे आदेशही ग्राम पंचायतीला देण्यात आले आहे.
बोगस भरती रद्द करण्यासाठी सहा महिन्यांपासून लढा होता सुरू
दोन वेळा ग्राम पंचायतीने वशिलेबाजीचा वापर करत कानाखालचा तरुणाची निवड लिपिक म्हणून करत होते.झालेली बोगस भरती रद्द करण्यासाठी सहा महिन्यांपासून लढा देत होतो.निकाल बाजूला लागला असला तरी ग्राम पंचायत पुनश्च बोगस भरती करणार नाही याकडे लक्ष ठेवून नवीन भरती शासन निर्णयानुसार लेखी परीक्षा घेऊनच करू देणार.
केतन धिवरे, तक्रारकर्ते