अमळनेर (प्रतिनिधी) उसतोडीसाठी पैशांच्या झालेल्या देवाणघेवाणच्या वादातून मजुराचे दोघांनी अपहरण केल्याची घटना दि 24 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास भाजीपाला मंडई घडली. याप्रकरणी अमळनेर पोलिसात दोन जणांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपहरण झालेल्या मजुरांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि.24 रोजी सकाळी 11 वाजता भाजीपाला मंडई मध्ये भाजीपाला घेण्यासाठी सासऱ्यासोबत गेले होते.मात्र ते बाजारकरून घरी आले नाहीत.रात्री अकरा वाजता पतीच्या व एका अनोळखी मोबाईल वरून फोन आला की,तुमचा पती जितेंद्र सुरेश पवार (रा.धुपी ता.अमळनेर) हा आमच्या ताब्यात असून आम्ही त्याला पैसे दिले आहेत.ते पैसे घेऊन या.असा फोन आला होता.त्यानंतर संपूर्ण कुटुंबाने त्यांची शोधाशोध घेतला असता ते मिळून आले नाहीत.फोन करणारे दोघांचा आवाज ओळखीचा वाटल्याने ऊस तोडणी साठी दिलेल्या पैश्यांच्या देवाणघेवाण वरून सुरेश सदू जाधव व अशोक सदू जाधव (रा.वसंत नगर ता.पारोळा) यांनी अपहरण केले आहे.कविता जितेंद्र पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन जणांवर भादवी कलम 363,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय शिंदे करीत आहेत.