अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर शहरात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची वाढलेली टवाळखोरी थांबविणे व निर्भया पथक स्थापन करणे बाबत पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांना दिलेल्या निवेदनात ढेकूरोड परिसरातील नगरसेवक घनश्याम उर्फ शाम पाटील यांनी केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की आपल्या अमळनेर शहरातील नामांकित महाविद्यालयात अलिकडेच खबरीलाल च्या माध्यमा- तून रॅगिंगचा प्रकार झाल्याचे वाचण्यात आले असून शहरातील प्रताप महाविद्यालय, धनदाई महाविद्यालय ढेकु रोड,डी आर. कन्याशाळा,साने गुरुजी विद्यालय, जी.एस.हायस्कुल यांच्यासह अनेक शाळा व महाविद्यालयाच्या परिसरात टवाळखोरीचे व गुन्हेगारीचे प्रकार वाढत असून ग्रामीण भागातून येणारे विद्यार्थी व विद्यार्थींनी देखील दहशतीत वावरतांना दिसतात. संत सखाराम महाराज,साने गुरुजी,प्रतापशेठजी यांची कर्मभूमी असलेल्या अमळनेर शहराच्या नावलौकी- कास धक्का पोहचत आहे. वरिल सर्व प्रकारास आळा घालण्यासाठी ठिकठिकाणी पोलीस संरक्षण देवून व निर्भयापथक स्थापन करुन अमळनेर शहर दहशत व गुन्हेगारीमुक्त करावे अशी अपेक्षा घनश्याम उर्फ शाम पाटील यांनी केली आहे.