खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

मोबाईलच्या अतिरेक वापरामुळे लग्न आणि कुटुंब व्यवस्था कोलमडली : शरद सोनवणे

गुजराथी महिला मंडळात डिजिटल डिटॉक्स विषयावर कार्यशाळेत मोलाचे मार्गदर्शन

अमळनेर (प्रतिनिधी) आज सर्वत्र मोबाईलचा अतिरेक वापर सुरू झाल्याने अनेक ठिकाणी लग्न आणि कुटुंब व्यवस्था मोडकळीस आली आहे. तर कुटुंबातील संवाद व संपर्क संपत चालला आहे, एवढेच नव्हे तर जुळलेली लग्न केवळ मोबाईलमुळे तुटत आहे. यामुळे प्रत्येकाने सजग होऊन मोबाईलचा वापर कमीतकमी करून ऑफलाईन संपर्क वाढवला पाहिजे, असा मोलाचा सल्ला अमळनेर येथील शरद सोनवणे यांनी केले.
डिजिटल डिटॉक्स या विषयावर गुजराथी महिला मंडळाच्या वतीने डिजीटल डिटॉक्स च्या उत्तर महाराष्ट्र राजदूत राजश्री कल्याण पाटील यांच्या सहकार्याने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शरद सोनवणे तसेच आय टी प्रोफेशनल वरद इन्फोटेक कॉम्प्युटरच्या संचालिका संध्या लोहार मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते.यावेळी शरद सोनवणे यांनी ऑफलाइन येण्याबद्दल सर्वांचे प्रबोधन केले. संध्या लोहार यांनी महिलांशी संवाद साधताना डिजिटल डिटॉक्स म्हणजे काय? आहे “स्मार्ट गॅजेट्स स्मार्टीचा वापर” डिजिटल डिटॉक्स महत्वाचे का आहे? हे तुमची उत्पादकता, झोप, आरोग्य सुधारते आणि तणाव, चिंता आणि नैराश्य कमी करते. विषारी सामग्रीऐवजी आरोग्यदायी सामग्रीचे सेवन करा आणि त्यात सामील व्हा असे आवाहन केले.तसेच “ऑफलाईन इज द न्यू लक्झरी” हे ब्रीदवाक्य त्यांनी सर्वाना दिले . दरम्यान डिजिटल डीटॉक्स म्हणजेच (डबल्यू डि डिडि )एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे, जी डिजिटल नैतिकता, डिजिटल शिष्टाचार, डिजिटल शिक्षण .डिजिटल फॉस्टिंग आणि मानव जीवनात सुसंवाद निर्माण करण्यासाठी काम करते. गुजराथी महिला मंडळात डिजिटल डिटॉक्सच्यव जनजागृती मोहिमेच्या मिशनला सर्व महिलांनी उत्तम प्रतिसाद दिला.यावेळी गुजराथी मंडळाच्या संचालिका सुनंदाबेन गुजराथी व उपाध्यक्षा सौ लता प्रेम शाह यांनी राजश्री पाटील तसेच शरद सोनवणे व संध्या लोहार यांचा सत्कार केला.कार्यशाळेचे नियोजन मंडळाच्या अध्यक्षा सौ भाविका जीवनांनी यांनी केले होते त्यांना मंडळाच्या कार्यकारी सदस्यांनी सहकार्य केले.सूत्रसंचालन डॉ. मंजुश्री जैन यांनी केले.यावेळी सर्वानी दैनंदिन जीवनात डिजिटल डीटॉक्स घेण्याची शपथ घेतली.

तंत्रज्ञानाचा अतिरेकी वापर घातक :राजश्री पाटील

डिजिटल डीटॉक्सच्या राजदूत राजश्री पाटील यांनी मोबाईल सोशल मीडिया आणि तंत्रज्ञानाचा अतिरेकी वापर, यामुळे कुटुंबातील आणि समाजातील सर्वात मोठी समस्या निर्माण होत आहे. तसेच तरुण पिढीसाठी एक मोठा दुष्परिणाम दिसून येत आहे.यासाठी तंत्रज्ञान आणि मानवी जीवन यांच्यातील समतोल जीवनाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी काय केले जाऊ शकते ? यावर आपण हे कसे नियंत्रित करू शकतो? यावर मार्गदर्शन केले.

समाजात सोशल मीडियाचा समतोल साधण्याचा दृष्टिकोन कसा शिकवायचा ?

या सर्व प्रश्नांची उत्तरे त्यांनी जागतिक डिजिटल डिटॉक्स डे फाउंडेशननेच्या वतीने उपस्थिताना दिली. तसेच मानवी जीवन आणि तंत्रज्ञान यामध्ये चालत असलेल्या समस्येवर अवेयरनेस करुण त्यावर उपाय देखील सांगत टर्नऑफ़ होऊन ट्यून इन का करायचे हे समजाऊन सांगीतले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button