अमळनेर (प्रतिनिधी) नगरपरिषद प्रशासनाने पुन्हा फायनल प्लॉट १२३ मधील सुमारे ३२ अतिक्रमित टपऱ्या, दुकाने , शेड , झोपड्या पोलिस बंदोबस्त हटवल्या आहेत. यावेळी अतिक्रमण धारकांनी स्वतःहून अतिक्रमण काढुन घेत होते.
गेल्या काही दिवसांपासून १२३ मधील अतिक्रमण काढण्याबाबत अनेकदा वाद उफाळले. ३ रोजी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे , संजय चौधरी , सोमचंद संदानशीव, आरोग्य अधिकारी हैबत पाटील , दिगंबर वाघ , प्रशांत ठाकूर , अविनाश संदाशीव , महेश जोशी ,मुकादम अनिल बाविस्कर , योगेश पाटील ,राधा नेतले ,चित्रा मोरे , उज्वला पाटील यांच्या पथकाने पालिकेने पुन्हा एकदा अतिक्रमित झोपड्या , टपऱ्या , पत्र्याचे शेड , दुकाने काढण्यास सुरुवात केली. दुकानदारांनी देखील स्वतः काढून घेण्यास सुरुवात केली. याठिकाणी असलेल्या जुनी पोलीस लाईन मधील रहिवाशी घरांना देखील यापूर्वी नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यांचे देखील अतिक्रमण टप्प्याटप्प्याने काढण्यात येणार आहे. काही किरकोळ व्यवसायिकांना पक्की दुकाने बांधली जात नाहीत तोपर्यंत एका बाजूला व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात आली. यावेळी पोलीस नाईक शरद पाटील, कपिल पाटील, सुनील पाटील, मिलिंद बोरसे यांनी बंदोबस्त ठेवला होता.
अतिक्रमण धारकाना अखेरची संधी
रहिवाशी अतिक्रमण धारकाना अखेरची संधी देण्यात येत असून त्यांनी ताबडतोब म्हाडा कॉलनीत घरे मिळवून घ्यावीत अथवा तेथील घरांचा ताबा घ्यावा.
– प्रशांत सरोदे , मुख्याधिकारी ,अमळनेर नगरपरिषद