शैक्षणिक स्थिती दर्जा सुधारण्यासाठी शिक्षकांनी नाविन्याची कास धरावी- डी.ए.धनगर

अमळनेर– राज्याची सध्याची शैक्षणिक स्थिती दर्जा सुधारण्यासाठी अध्ययन निष्पत्ती ७५ टक्के झाली पाहिजे त्यासाठी शिक्षकांनी नाविन्याची कास धरावी आणि शाळा विद्यार्थ्यांसाठी तयार करावी असे आवाहन गणित विषयाचे राज्यस्तरीय सुलभक डी ए धनगर यांनी गणित शिक्षकांना उदबोधन प्रसंगी केले.
अमळनेर व पारोळा तालुक्यातील ५ वी ते १० वी ला गणित विषय शिकवणाऱ्या शिक्षकांचा उद्बोधन वर्ग ग स शाळेत आयो- जित करण्यात आला होता शिक्षणातील अध्यापन पद्धतीत झालेला बदल शिक्षकांनी स्वीकारून माध्यमिक शाळेटील मुलांची गळती थांबवावी , प्रत्येक विद्यार्थ्याने वयोगटानुसार अपेक्षित क्षमता विकसित करणे,माध्यमिक शिक्षकाला अध्यापन करण्या साठी योग्य ती दिशा व आवश्यक ती मदत मिळावी ,शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करावे यासाठी शासनाने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत.
उद्बोधन वर्गासाठी एम एस नेमाडे, परेश श्रावगी , पी एस नेमाडे , डी ए धनगर या राज्यस्तरीय सुलभकानी मार्गदर्शन केले उद्बोधन वर्गासाठी डी आय इ सी पी डी च्या अधिव्याख्याता सूचिता पाटील, पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे, विषय तज्ञ प्रमोद पुनवटकर , प्रमोद पाटील, किशोर ठाकरे , शिरसाठ आदींनी सहकार्य केले उद्बोधन वर्गास अमळनेर व पारोळा तालुक्यातील २०० शिक्षक हजर होते.
या वेळी मंगरुळ माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक संजय पाटील यांनी बोलक्या भिंती केल्यानं विशेष सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *